महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदानावर उद्या फैसला; हायकोर्टातील सुनावणी पूर्ण

मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्षणी ७६ लाखांहून अधिक मतदान झाले. त्या मतदानाचा ठोस पुरावा नाही. २८८ मतदारसंघांपैकी १९ जागांवर घोषित मतांपेक्षा जास्त मतदान झाले, तर ७६ जागांवर कमी मतदान नोंद झाले, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानात घोळ झाल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालय बुधवार, २५ जूनला अंतिम निकाल जाहीर करणार आहे. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यानंतर ७६ लाखांहून अधिक मतदान झाले, असा आरोप याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात केला. त्यांच्या युक्तिवादासह प्रतिवादी निवडणूक आयोग आणि राज्य सरकारची बाजू ऐकून घेत न्यायालयाने सोमवारी सुनावणी पूर्ण केली आणि निकाल राखून ठेवला. या निकालाकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

विक्रोळी येथील रहिवासी चेतन अहिरे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे अंतिम सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा केला. त्याची नोंद खंडपीठाने घेतली.

निवडणुकीत शेवटच्या क्षणी ७६ लाखांहून अधिक मतदान

मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्षणी ७६ लाखांहून अधिक मतदान झाले. त्या मतदानाचा ठोस पुरावा नाही. २८८ मतदारसंघांपैकी १९ जागांवर घोषित मतांपेक्षा जास्त मतदान झाले, तर ७६ जागांवर कमी मतदान नोंद झाले, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.

ऐन उन्हाळ्यात राज्यात मलेरिया - डेंग्यूचा कहर! मुंबईत मलेरियाच्या ९१८ रुग्णांची नोंद; तीन महिन्यांतील एकूण रुग्णसंख्या २,३९२

समाज माध्यमांतील बदनामी रोखण्यासाठी समिती; पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली लवकरच स्थापना - मुख्यमंत्री

शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी 'लवकर या, लवकर जा' सवलत; मुंबई महानगर क्षेत्रासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घोषणा

कोविड लसीकरण दुष्परिणाम, भरपाई धोरण तयार करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश; तज्ज्ञ समिती स्थापन करण्यास नकार

पात्र मतदाराचे नाव कापले जाणार नाही! मुख्य निवडणूक आयुक्तांनी केले स्पष्ट