महाराष्ट्र

‘त्या’ पोलिसांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी; पुण्यात तरुणींवर बेकायदेशीर कारवाई

पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले, त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? या पोलिसांवर ॲट्रॉसिटी कलमाखाली तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Swapnil S

मुंबई : पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले, त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? या पोलिसांवर ॲट्रॉसिटी कलमाखाली तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

एका महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींच्या घरात घुसून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. या मुजोर पोलिसांना कोण पाठीशी घालत आहे? कोणाच्या दडपणाखाली पोलीस काम करत आहेत, तीन तरूण मुलींवर पोलीस अत्याचार करतात आणि कारवाई होत नाही. एफआयआर नोंदवण्यास कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याच्या पालकमंत्र्यांनी जातीने याप्रकरणी लक्ष घालून पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

पुण्यातील गुन्हेगारी मोडीत काढावी!

पुण्यात ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरू आहे. कोयता गँगचा हैदोस सुरू आहे, त्याला आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पुण्यात दादागिरी वाढली आहे असे खुद्द मुख्यमंत्रीच जाहीरपणे सांगत आहेत. पण कारवाई मात्र करत नाहीत. पुणे पोलिसांनी सर्वसामान्य लोकांना कायद्याचा नाहक बडगा दाखवण्याऐवजी पुण्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम करण्याची गरज आहे, असे सपकाळ म्हणाले.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

Mumbai : घर बदलणं महागात पडलं! 'मूव्हर्स अँड पॅकर्स'च्या कर्मचाऱ्यांनी ६.८ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास; गुन्हा दाखल

Mumbai : १५ वर्षांनंतर MMRDA चा निर्णय; वडाळा ट्रक टर्मिनल प्लॉटचा १,६२९ कोटींना लिलाव होणार

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन