महाराष्ट्र

शहापूर तालुक्यातील धबधब्यांवर जाण्यास बंदी!

अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत.

नवशक्ती Web Desk

शहापूर : शहापूर तालुक्यातील निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी पावसाळ्यात ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक येथून पर्यटक येत असतात. मात्र बाहेरून येणारे पर्यटक तालुक्याच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक रचनेबद्दल अनभिज्ञ असल्याने येथे पावसाळ्यात ओसंडून वाहणारे धबधबे, धरणे, तलाव आदी ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दि. ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत भातसा धरण, कुंडन, दहिगाव, माहुली किल्याचा पायथा, चेरवली, अशोका धबधबा, खराडे, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंभे नदी किनारा, कसारा येथील सर्व धबधबे, कसारा घाट, चोंढे धबधबा या ठिकाणी पावसाळी सहलीसाठी जाऊ नये या करिता, मनाई आदेश काढला आहे. मात्र या मनाई हुकूमाबाबत पर्यटकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.
तालुक्यातील धबधबे तलाव तसेच धरणे या ठिकाणी पावसात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यापूर्वी जीवितहानी होण्याच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहावी या अनुषंगाने धबधबे, धरण, तलाव या परिसरात १ किलो मीटर सर्व वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात जाणे, पोहणे, पाण्याच्या प्रवाहाखाली बसने, धबधब्यावर जाणे, धोका दायक ठिकाणी सेल्फी काढणे, धबधबा परिसरात मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे इत्यादी सर्व बाबींवर प्रतिबंध घालण्यात आले आहे.

Delhi Riots 2020 : गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा हत्येप्रकरणी माजी AAP नगरसेवक ताहीर हुसेनला जन्मठेप

Bhiwandi Building Collapse : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

August 2026 Dry Days : ऑगस्टमध्ये पार्टीचा प्लॅन करताय? 'या' २ दिवशी बंद राहणार दारूची दुकाने

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! जादा सामानासाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही; जाणून घ्या नवे नियम