महाराष्ट्र

शहापूर तालुक्यातील धबधब्यांवर जाण्यास बंदी!

अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत.

नवशक्ती Web Desk

शहापूर : शहापूर तालुक्यातील निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी पावसाळ्यात ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक येथून पर्यटक येत असतात. मात्र बाहेरून येणारे पर्यटक तालुक्याच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक रचनेबद्दल अनभिज्ञ असल्याने येथे पावसाळ्यात ओसंडून वाहणारे धबधबे, धरणे, तलाव आदी ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दि. ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत भातसा धरण, कुंडन, दहिगाव, माहुली किल्याचा पायथा, चेरवली, अशोका धबधबा, खराडे, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंभे नदी किनारा, कसारा येथील सर्व धबधबे, कसारा घाट, चोंढे धबधबा या ठिकाणी पावसाळी सहलीसाठी जाऊ नये या करिता, मनाई आदेश काढला आहे. मात्र या मनाई हुकूमाबाबत पर्यटकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.
तालुक्यातील धबधबे तलाव तसेच धरणे या ठिकाणी पावसात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यापूर्वी जीवितहानी होण्याच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहावी या अनुषंगाने धबधबे, धरण, तलाव या परिसरात १ किलो मीटर सर्व वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात जाणे, पोहणे, पाण्याच्या प्रवाहाखाली बसने, धबधब्यावर जाणे, धोका दायक ठिकाणी सेल्फी काढणे, धबधबा परिसरात मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे इत्यादी सर्व बाबींवर प्रतिबंध घालण्यात आले आहे.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी