ANI
महाराष्ट्र

राज ठाकरे जरी स्वत:च्या तोंडून खेद व्यक्त करू शकले नाहीत, तरी...

राज ठाकरेंनी अयोध्येला येण्याचे टाळून उत्तर भारतीयांचा सन्मान केल्याचे ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटले

नवशक्ती Web Desk

गेल्या वर्षी जूनमध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला केलेला विरोध चर्चेचा विषय ठरला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, अशी घोषणा ब्रिजभूषण सिंह यांनी केली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता त्याच ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्याशी आपले कोणतेही वैयक्तिक भांडण नसून त्यांनी असे विधान करून एक प्रकारे उत्तर भारतीयांचा गौरव केला आहे, असे म्हटले. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध नाही, पण ते आले तर स्वागतच आहे, असे स्पष्टीकरण ब्रिजभूषण सिंह यांनी दिले आहे.

राज ठाकरेंनी अयोध्येला येण्याचे टाळून उत्तर भारतीयांचा सन्मान केल्याचे ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. “माझे राज ठाकरे यांच्याशी वैयक्तिक वाद नाही. त्यावेळी मी उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर म्हणालो होतो की त्यांनी माफी मागावी आणि मग इथे यावे. पण त्यांनी इथे न येता एक प्रकारे आमचा सन्मान केला आहे. त्यामुळे मोठा वाद टळला. आता मला वाटतं ते आले तर मला काही आक्षेप नाही. कोणाचाही आक्षेप नाही,' असे ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्ट केले आहे.'' त्यानंतर त्यांनी वाद टाळून उत्तर भारतीयांचा आदर केला. ते खेद व्यक्त करू शकले नाहीत किंवा माफी मागू शकत नसले तरी न येणे हा एक प्रकारे उत्तर भारतीयांचा सन्मान आहे. आता मला राज ठाकरेंबद्दल काही बोलायचे नाही. अयोध्या जशी आमची आहे तशीच राज ठाकरेंचीही आहे. त्यांनी इथे यावे, त्यांचे स्वागत आहे", असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले.

Mumbai : मुलुंडच्या एलबीएस रोडवर भीषण अपघात; मेट्रो लाईनचा स्लॅब वाहनांवर कोसळला; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी, Video

ठाण्यातील पाणीटंचाईबाबत ठोस कृती आराखडा तयार करा; पाणी व्यवस्थापनाबाबत महापौरांचे निर्देश

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक

Navi Mumbai : लेखनिक परवानगीसाठी लाच; सहाय्यक अधीक्षक जाळ्यात

भटक्या कुत्र्यांना मुंबईबाहेर मिळणार निवारा; सांभाळ करण्याचे खासगी संस्थांना आवाहन; देखभाल केल्यास BMC रक्कम मोजणार