महाराष्ट्र

बिहारमध्ये विषारी दारू पिऊन १३ जणांचा मृत्यू

Swapnil More

भागलपूर

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने बांका, भागलपूर आणि मधेपुरामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

होळीच्या दिवशी मद्य प्राशन केल्याने बांकामध्ये सहा, भागलपूरमध्ये चार आणि मधेपुरा येथे तीन जणांचा मृत्यू झाला. तर एका व्यक्तीची दृष्टीही गेली. याशिवाय, काहींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बिहारमध्ये दारुबंदी आहे. तरीही दारूची विक्री केली जाते. विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याचे भागलपूरच्या साहेबगंज येथील मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले. विनोद राय, संदीप यादव, नीलेश कुमार, मिथुन कुमार अशी भागलपूरमधील मृतांची नावे आहेत. सर्व मृत हे एकाच गावातील आहेत. विषारी दारू प्यायल्याने अभिषेक कुमारची दृष्टी गेली आहे. त्याच्यावर मायागंज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai : परळ स्थानकाचे पुन्हा नूतनीकरण; विस्तारीकरणासाठी नव्या बांधकामावर हातोडा?

VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

देवनार कचरा प्रकल्पाला बसणार मोठा आर्थिक भुर्दंड; पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन; दंडाची नव्याने गणना करण्याचे NGT चे आदेश

Bigg Boss Marathi 6: पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते अडचणीत? 'त्या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप, विजेतेपदाच्या चर्चेला नवं वळण

IPL 2026 : मुंबई रोखणार पंजाबचा विजयरथ? वानखेडेवर आज उभय संघ आमनेसामने; रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम कायम