महाराष्ट्र

बिहारमध्ये विषारी दारू पिऊन १३ जणांचा मृत्यू

Swapnil More

भागलपूर

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने बांका, भागलपूर आणि मधेपुरामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

होळीच्या दिवशी मद्य प्राशन केल्याने बांकामध्ये सहा, भागलपूरमध्ये चार आणि मधेपुरा येथे तीन जणांचा मृत्यू झाला. तर एका व्यक्तीची दृष्टीही गेली. याशिवाय, काहींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बिहारमध्ये दारुबंदी आहे. तरीही दारूची विक्री केली जाते. विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याचे भागलपूरच्या साहेबगंज येथील मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले. विनोद राय, संदीप यादव, नीलेश कुमार, मिथुन कुमार अशी भागलपूरमधील मृतांची नावे आहेत. सर्व मृत हे एकाच गावातील आहेत. विषारी दारू प्यायल्याने अभिषेक कुमारची दृष्टी गेली आहे. त्याच्यावर मायागंज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Maharashtra Election Results Live : मुंबईत ठाकरे बंधूंना, पुण्यात दोन्ही पवारांना धक्का; २९ पैकी २१ महापालिका 'भाजपमय'!

मराठीविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदाराने ठाकरे बंधूंना डिवचले; BMC निकाल बघून म्हणाले, "मी मुंबईत येऊन उद्धव-राज...

ठाकरे बंधूंना धक्का? BMC सह राज्यातील बहुतांश महापालिका होणार 'भाजपमय'; विविध 'एक्झिट पोल'मधील अंदाज

Thane : अनेक मतदान केंद्रांवर EVM बिघाड; मशीन बंद, सिरीयल क्रम चुकले; मतदारांना मनस्ताप

पुणे - पिंपरीमध्ये मतदानात मोठा गोंधळ!मतदारयादीतील नावे गायब, ईव्हीएम बिघाड, बोगस मतदानाचे आरोप