संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नाव कायम राहणार

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव हे कायम राहणार आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव हे कायम राहणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नामांतराच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने सरकारला दिला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यास ‘एमआयएम’ पक्षाने विरोध केला होता. तसेच या विरोधात न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.

हा बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका ‘पोस्ट’द्वारे जाहीर केले. बाळासाहेब ठाकरे यांनी ९ मे १९८८ रोजी या दोन्ही शहरांचे नामांतर केले होते. त्यावर न्यायदेवतेनेही आज एक प्रकारे मोहोर उठवली आहे.

Maharashtra Weather : पावसाचा तडाखा वाढणार; "समुद्रकिनारे, धबधब्यांपासून दूर राहा," मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Mumbai Rain : मुसळधार पावसाचा धोका वाढला; खासगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे

Mumbai Rain : मुंबईच्या डबेवाल्यांनाही मुसळधार पावसाचा फटका; आज सेवा बंद

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला; रेल्वे मार्गावरील काम सुरू, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

Mumbai Rain : मुंबईसाठी रेड अलर्ट! ताशी ९० किमी वेगाने वादळी वारे; अतिवृष्टीचा इशारा, १५ हजार कर्मचारी तैनात