संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नाव कायम राहणार

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव हे कायम राहणार आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव हे कायम राहणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नामांतराच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने सरकारला दिला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यास ‘एमआयएम’ पक्षाने विरोध केला होता. तसेच या विरोधात न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.

हा बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका ‘पोस्ट’द्वारे जाहीर केले. बाळासाहेब ठाकरे यांनी ९ मे १९८८ रोजी या दोन्ही शहरांचे नामांतर केले होते. त्यावर न्यायदेवतेनेही आज एक प्रकारे मोहोर उठवली आहे.

Nepal Floods : 'मदत नाही, नुकसानभरपाई हवी'; महाप्रलयानंतर नेपाळची भारत, चीनसह अमेरिकेकडे मागणी

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा

Mumbai : व्हीआयपी गाडीला वाट देण्यासाठी मजुराची सायकलच उचलून फेकली; पोलिसाचा संतापजनक Video व्हायरल

पत्नीने BSF उपनिरीक्षक पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं; पोलिसांना घेऊन थेट हॉटेल गाठलं अन्..., Video

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI चौकशीचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय