संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नाव कायम राहणार

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव हे कायम राहणार आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव हे कायम राहणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नामांतराच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने सरकारला दिला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यास ‘एमआयएम’ पक्षाने विरोध केला होता. तसेच या विरोधात न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.

हा बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका ‘पोस्ट’द्वारे जाहीर केले. बाळासाहेब ठाकरे यांनी ९ मे १९८८ रोजी या दोन्ही शहरांचे नामांतर केले होते. त्यावर न्यायदेवतेनेही आज एक प्रकारे मोहोर उठवली आहे.

AI समिटमध्ये मोठी नाचक्की! चिनी रोबोटला स्वतः डेव्हलप केल्याचं सांगितलं; 'तात्काळ एक्स्पो स्थळ सोडा' - गलगोटिया विद्यापीठाला आदेश

मोठी बातमी! EC कडून राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा: महाराष्ट्रात सर्वाधिक ७ जागा, १६ मार्चला मतदान

Thane : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनचालकांना दिलासा; साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी अखेर खुला

Mumbai : स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट समितीसाठी आज अर्ज दाखल होणार

Mumbai : रस्ते खड्ड्यात घालणाऱ्या कंत्राटदारांना ३७ कोटींचा दंड; वसुली केवळ १६ कोटींची