संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नाव कायम राहणार

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव हे कायम राहणार आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव हे कायम राहणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नामांतराच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने सरकारला दिला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यास ‘एमआयएम’ पक्षाने विरोध केला होता. तसेच या विरोधात न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.

हा बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका ‘पोस्ट’द्वारे जाहीर केले. बाळासाहेब ठाकरे यांनी ९ मे १९८८ रोजी या दोन्ही शहरांचे नामांतर केले होते. त्यावर न्यायदेवतेनेही आज एक प्रकारे मोहोर उठवली आहे.

केंद्र सरकारचा निर्णय; ‘आधार' ॲपची सक्ती नाही, प्री-इन्स्टॉलचा प्रस्ताव रद्द

Mumbai : मे अखेरपर्यंत कोस्टल रोडवर दोन फ्लड गेट्स बसवणार; इंदूर येथे चाचणी झाली पूर्ण

Dhule : 'कोणीतरी ओढत नेतंय'? १८ वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; CCTV मधील दृश्यांमुळे नागरिक हैराण

Nagpur : १८ बाटल्या फोडल्या; दारू नाकारताच तरुणांचा बारमध्ये धुडगूस, मॅनेजर रक्तबंबाळ, VIDEO व्हायरल

'मुव्ही ट्रॅप' रोखणार डासांची उत्पत्ती; मलेरिया, डेंग्यू आजारांचा प्रादुर्भाव नियंत्रित होणार