महाराष्ट्र

नैतिकता असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - उद्धव ठाकरे

लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष आणि जनतेला एकत्र करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला बळ देण्यासाठी हे दोघे आले

नवशक्ती Web Desk

न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आपला निर्णय दिल्यानंतर राज्यात आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत कोर्टाच्या निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट केली. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

कायद्यानुसार माझा राजीनामा अवैध असू शकतो. पण नीतीमत्तेचा प्रश्न येतो, या मुख्यमंत्र्यांमध्ये नैतिकता असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मी राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. पण मी स्वतःसाठी लढत नाही. आम्हाला हा देश वाचवायचा आहे. 

मी एका गोष्टीवर समाधानी आहे. हा निर्णय शिवसेनेचा नसून लोकशाहीचा आहे, असे मी म्हणत होतो. न्यायालयाने आज दिलेल्या निकालात सत्तेसाठी भुकेल्या लोकांचे उघड राजकारण उद्ध्वस्त झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यपालांची भूमिका अयोग्य होती. राज्यपालांची भूमिकाही काढून घेण्यात आली आहे. राज्यपाल व्यवस्था ही आजवर आदरणीय व्यवस्था होती. पण राज्यपाल ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत, ते पाहिल्यानंतर राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात असावी की नसावी, हा मोठा विचार सर्वोच्च न्यायालयासमोर व्हायला हवा. राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत दिला आहे असेही ठाकरे म्हणाले.   

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव पहिल्यांदाच मातोश्रीवर आले. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष आणि जनतेला एकत्र करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला बळ देण्यासाठी हे दोघे आले आहेत.

Mumbai : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; १० विद्यार्थी जखमी, बचावकार्य सुरू, Video

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल

सचिन अहिर यांनी पक्ष सोडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले - "जे कधीच नव्हते आमचे...

आता मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅट; WhatsApp चं नवं Username फीचर, जाणून घ्या डिटेल्स

आता एका क्लिकवर मिळणार सरकारी पुस्तके; राज्य शासनाचे ऑनलाइन पोर्टल लवकरच सुरू