महाराष्ट्र

मनोज जरांगे-पाटील यांच्या ठाणे दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले "ठाण्यातील सभा म्हणजे..."

मनोज जरांगे-पाटील हे राज्यभर फिरुन सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ते ठाणे-पालघर च्या दौऱ्यावर आहेत.

नवशक्ती Web Desk

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडलं आहे. मनोज जरांगे-पाटील हे राज्यभर फिरुन सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ते ठाणे-पालघर च्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाण्यात मनोज जरांगे-पाटील हे सभा घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या ठाण्यातील सभेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील हे सध्या सगळीकडे सभा घेत आहेत. त्यामध्ये कसलीही अडचण नाही. ते सगळ्या मराठा बांधवांना भेटत आहेत. ठाण्यातील त्यांची सभा म्हणजे माझ्या विरोधातील सभा नाही. ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत. सर्वांशी संवाद साधताय.

मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनाची भूमिका अतिशय ठाम आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार यासाठी कटीबद्द आहे. इतर कुठल्याही समाजाचं किंवा ओबीसींचं आरक्षण कमी न करता, कुणावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देणं सरकारची जबाबदारी आहे. त्यावर युद्धी पातळीवर काम सुरु आहे. मराठवाड्यात जुन्या कुणबी नोंदी सापडत आहेत. न्यायमूर्ती शिंदे यांची समिती यावर काम करत आहे. कायमस्वरुपी टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण सरकार देणार आहे. त्यावर आमचं युद्ध पातळीवर काम सुरु आहे, असं शिंदे म्हणाले. ते कोल्हापूर येते पत्रकारांशी बोलत होते.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत