महाराष्ट्र

काँग्रेसचा आजचा आर्थिक अजेंडा फूट पाडणारा; राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांची टीका

काँग्रेस पक्षाने खरे म्हणजे ज्या धोरणांवर चर्चा करायला हवी त्याऐवजी ते जगभर अपयशी ठरलेल्या साम्यवादी आणि समाजवादी धोरणांबद्दल बोलत आहेत, असे मिलिंद देवरा म्हणाले.

Swapnil S

मुंबई : एकेकाळी आर्थिक सुधारणांची सुरुवात करणाऱ्या काँग्रेसकडे सध्या फूट पाडणारा आर्थिक अजेंडा आहे. आणि हा अजेंडा भारतीय आर्थिक विकासाची गाडी रुळावर आणू पाहात आहे, अशी टीका करीत शिवसेनेचे राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांनी काँग्रेस हा एक मध्यवर्ती पक्ष आहे, असे असूनही तो खूपच डावीकडे वळला असल्याचे एका मुलाखतीत सांगितले.

काँग्रेस पक्षाने खरे म्हणजे ज्या धोरणांवर चर्चा करायला हवी त्याऐवजी ते जगभर अपयशी ठरलेल्या साम्यवादी आणि समाजवादी धोरणांबद्दल बोलत आहेत, असे देवरा म्हणाले. देवरा यांनी या वर्षी जानेवारीत काँग्रेस पक्षाचा त्याग करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेस स्वतःच्या वारशापासून दूर जात असल्याचे लक्षण आहे, असे सांगत ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचा भारताला पुढे नेण्याचा आर्थिक अजेंडा होता. आज, मला असे वाटते की काँग्रेसकडे एक आर्थिक अजेंडा आहे जो फूट पाडणारा आहे. आज जगाला गुंतवणुकीसंबंधात चीनपासून वेगळे व्हायचे आहे व भारतात गुंतवणूक करायची आहे. ते म्हणाले की, आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसमधील बरेच लोक पक्षाच्या सध्याच्या आर्थिक दृष्टिकोनाची जबाबदारी घेणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसनेच १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सुधारणा लागू केल्या, पण काँग्रेस त्या सुधारणांपासून दूर गेली, असे त्यांनी सांगितले.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस