संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

कंत्राटदारांचा संयम सुटणार; अभियंता महासंघाचा इशारा

राज्य सरकारच्या विविध विभागातील विकास कामे मार्गी लावणाऱ्या तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांची तब्बल ९० हजार कोटींची बिल राज्य सरकारने थकवली आहेत.

Swapnil S

मुंबई : राज्य सरकारच्या विविध विभागातील विकास कामे मार्गी लावणाऱ्या तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांची तब्बल ९० हजार कोटींची बिल राज्य सरकारने थकवली आहेत. बिलाची रक्कम मिळावी यासाठी १० मार्च रोजी राज्यातील २५ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. १० मार्चला अर्थसंकल्प सादर केला त्यादिवशी जिल्ह्यात आंदोलन केले आणि राज्य सरकारने दखल घेतली नसल्याने कंत्राटदारामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांचा संयम सुटला असून पुढील चार ते पाच दिवसांत टोकाची भूमिका घेणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजिनिअर मिलिंद भोसले यांनी सांगितले. राज्य सरकारच्या विविध विभागातील विकास कामे मार्गी लावली. तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. राज्याचा विकास या उद्देशाने यासाठी दिवसरात्र कंत्राटदार झटत राहिले. मात्र कामाच्या बिलाची रक्कम देण्याची वेळ आली त्यावेळी राज्य सरकारने दुर्लक्ष केले. या भूमिकेमुळे तीन लाखांहून अधिक कंत्राटदार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

'वंदे मातरम्' चर्चेत मोदींच्या भाषणावर काँग्रेसचा हल्लाबोल; प्रियंका गांधी म्हणाल्या, “मोदी उत्तम भाषण देतात, पण...

'वंदे मातरम्' चर्चेतून राजकारण तापलं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; ‘वंदे मातरम्’वर भाजपचा दावा कशासाठी?

MPSC ची मोठी घोषणा : संयुक्त परीक्षांच्या तारखेत बदल; २१ डिसेंबरच्या मतमोजणीमुळे आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

नाशिक-मुंबई लोकलचे स्वप्न पूर्ण होणार! कसारा-मुंबई, मनमाड-कसारा मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनसाठी हिरवा कंदील

भारतातील रस्त्याला चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव; 'या' राज्याची मोठी घोषणा, भाजपकडून टीकेची झोड