महाराष्ट्र

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान १० दिवस 'ड्राय डे'? पोलीस आयुक्तांकडे मागणी

गणेशोत्सवासाठी काही दिवस शिल्लक राहिले असून घरोघरी बाप्पांच्या स्वागतासाठी भक्ताची तसेच सार्वजनिक मंडळांची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर पोलीस व जिल्हा प्रशासनाकडूनही तयारी केली जात आहे.

Swapnil S

पुणे : पुणे शहरातील गणेश मंडळांनी गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद (ड्राय डे) ठेवण्यात यावी अशी मागणी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी काही गणेश मंडळांनी ही मागणी केली आहे.

गणेशोत्सवासाठी काही दिवस शिल्लक राहिले असून घरोघरी बाप्पांच्या स्वागतासाठी भक्ताची तसेच सार्वजनिक मंडळांची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर पोलीस व जिल्हा प्रशासनाकडूनही तयारी केली जात आहे. पुणे शहरातील गणेश मंडळांनी गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद (ड्राय डे) ठेवण्यात यावी अशी मागणी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शहरातील ३०० मंडळांचे ६०० प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत त्यांच्या सूचना मांडल्या असून काही मंडळांनी दहा दिवस ड्राय डे ठेवल्याने कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहील असे मत व्यक्त केले.

यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल आणि डीजेसंदर्भात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या बाबत प्रत्येक मंडळांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली जाईल. गणेश उत्सव उत्साहात मात्र नियमात साजरा व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असेल. विसर्जन मिरवणुकीत एका मंडळाच्या समोर किती ढोल पथके असणार याचा निर्णय पुढच्या बैठकीत घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

एक खिडकी योजना

गेल्या वर्षी ज्या गणेश मंडळांनी परवानगी घेतली आहे त्यांना ५ वर्षे परवानगी घेण्याची गरज नसल्याची माहिती आयुक्तांनी दिली. तसेच नवीन मंडळांसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात येणार आहे. अनेक गणेश मंडळे हे वर्गणी न घेता उत्सव मंडळात स्टॉलला परवानगी देताना, या वेळी वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. तसेच कमानी उभारताना देखील वाहतुकीचा विचार करून नियमात बसेल अशा पद्धतीने उभाराव्यात. या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या वेळेसंदर्भात प्रत्येक झोननुसार बैठका घेतल्या जाणार आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली