File Photo ANI
महाराष्ट्र

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा,अजित पवारांची मागणी

मराठवाडा, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

प्रतिनिधी

सरकारमध्ये येऊनही भूक संपली नाही का असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना केला आहे. तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी तातडीने अधिवेशन बोलवा असे म्हणत शेतकऱ्यांना आणि जनतेला दिलासा द्यावे असेही म्हटले आहे.

मराठवाडा, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारने यासाठी तातडीने अधिवेशन बोलवत शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा द्यायला हवा असे अजित पवारांनी पत्रात नमुद केले आहे.

जून 20 पासून विदर्भ आणि मराठवाड्यांच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नदी - नाल्यांना पूर आला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून अनेकांच्या शेतातील माती खरडून गेली आहे. अनेकांनवर दुबार अन् तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे. राज्यभरातील धरणं जुलै महिन्यातच 65 टक्के भरली आहेत. यामुळे येणाऱ्या काळात ते ओव्हर फ्लो होताय का असा धोका असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. मात्र चिपळून रत्नागिरीमध्ये पाणी साचले नाही हे खूप चांगले झाले त्यासाठी आम्ही नद्यांमधील गाळ काढला होता.

दिल्लीच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार

मागील सरकारच्या काळातील योजना थांबविण्याचे काम हे सरकार करत आहे. त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच सरकार चालवत आहे त्यांना कुणाला त्रास द्यायचा नाही की काय असा मिश्कील सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. शिंदें - फडणवीसांना दिल्लीतून हिंरवा कंदील मिळाल्या शिवाय ते काहीच करू शकत नाही.

गुजरातच्या सत्तेत मोठा फेरबदल; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या नवे मंत्री शपथ घेणार

Mumbai : पूजा खेडकरच्या वडिलांना न्यायालयाचा दिलासा, ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

Canada News : कपिल शर्माच्या ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! रशियात नोकरीचं आमिष दाखवून युक्रेनसोबतच्या युद्धात लढायला पाठवलं; "माझ्या पतीला भारतात परत आणा" - पत्नीची याचना

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव