महाराष्ट्र

'ते काही माझे शत्रू नाहीत'; फडणवीसांचे ठाकरे पिता-पुत्रांबद्दल मोठे विधान

प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात अनेकदा टीकाटिप्पणी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. असे असताना नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केले की, "उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. आमच्यामध्ये फक्त वैचारिक मतभेद आहे. ते वेगळ्या विचारासोबत गेले आणि मी वेगळ्या विचाराचा आहे." त्यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याआधी आदित्य ठाकरे म्हणले होते की, "आमच्यात राजकीय विरोध असू शकतो पण आम्ही अजूनही त्यांना मित्र मानतो, तुम्ही त्यांना विचारा ते आम्हाला काय मानतात?" असे विधान केले होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रातील संस्कृतीनुसार आम्ही फक्त वैचारिक विरोधक आहोत. अलीकडच्या काळामध्ये आमच्यामध्ये थोडे शत्रुत्व पाहण्यास मिळत आहे, पण ते योग्य नसून कधीतरी आपल्याला संपवावे लागेल. आम्ही वैचारिक विरोधक असलो तरीही आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही," गेले काही दिवस, देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मग ते पहाटेच्या शपथविधीचा असो किंवा २०१९मध्ये उद्धव ठाकरेंची काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी असो. पण, त्यांनी केलेल्या या नव्या विधानामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त