संग्रहित छायााचित्र 
महाराष्ट्र

राजकीय नेत्यांच्या सभेला जाऊ नका; जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आवाहन

राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नये, असे आवाहन मनोज जरांगे - पाटील यांनी मराठा समाजाला शुक्रवारी केले.

Swapnil S

बीड : राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नये, असे आवाहन मनोज जरांगे - पाटील यांनी मराठा समाजाला शुक्रवारी केले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांनी हे आवाहन केल्यामुळे राजकीय पक्षांना आपल्या बड्या नेत्यांच्या सभांना गर्दी जमवताना नाकीनऊ येण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे - पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर सक्रीय झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापासून ते पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. बीड जिल्ह्यातील बेलगाव येथे मराठा बांधवांशी शुक्रवारी संवाद साधताना त्यांनी मराठा समाजाला राजकीय नेत्यांच्या सभांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

जरांगे म्हणाले, सध्या महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यांना दंगली घडवायच्या आहेत. पण तुम्ही शांत व सावध राहा. त्रास देणाऱ्याला आपल्याला पाडायचे आहे. मी एकेका काठीचा (आंतरवाली सराटीतील लाठीचार्ज) हिशेब घेईल. आता कितीही त्रास झाला तरी मागे हटायचे नाही. आपण आपली, असे आवाहनही त्यांनी केले.

जरांगे यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा समाजाने राजकीय सभांपासून अंतर राखण्याचा निर्णय घेतला तर आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना आपल्या बड्या नेत्यांच्या सभांना गर्दी जमवणे कठीण होणार आहे.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर