महाराष्ट्र

वीज कर्मचारी दोन दिवस संपावर जाणार, ठोस निर्णय न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा

या संपानंतरही सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास कोणत्याही क्षणी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय समिती घेईल, असा इशारा दिला आहे.

Swapnil S

मुंबई : १६ जलविद्युत निर्मिती केंद्रांच्या खासगीकरणाला विरोध, केंद्र सरकारच्या धर्तीवर वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी, महापारेषण कंपनीतील २०० कोटींवरील प्रकल्प खासगी भांडवलदारांना देण्यास विरोध आणि स्मार्ट प्रीपेड मीटरचा प्रकल्प सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावा या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने २५ व २६ सप्टेंबर रोजी संपावर जाण्याची नोटीस सरकार आणि प्रशासनाला दिली आहे.

या संपानंतरही सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास कोणत्याही क्षणी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय समिती घेईल, असा इशारा दिला आहे. विविध मागण्यांबाबत कृती समितीमार्फत गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून समितीमार्फत २५ व २६ सप्टेंबर रोजी सलग २ दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि तिन्ही वीज कंपन्यांच्या प्रशासनास संपाची नोटीस दिली आहे.

वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही असे आश्वासन आंदोलन संपवताना संयुक्त निवेदनाद्वारे सरकारने दिले होते. त्यानंतरही वीज कंपन्यांमध्ये खासगीकरण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून त्याला कृती समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे.

समय रैनासह ५ कॉमेडियन्सना 'सर्वोच्च' दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणातील सर्व FIR रद्द

स्वातंत्र्यदिनाआधी दिल्ली उच्च न्यायालय, विमानतळासह अन्य ठिकाणी बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

'हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण?' NALSAR प्रकरणात सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा BCI ला सवाल

ST च्या स्मार्टकार्डला उत्स्फूर्त प्रतिसाद; १ कोटीहून अधिक प्रवाशांची नोंदणी, ६४ लाखांहून अधिक कार्ड सक्रिय

अल्पवयीन मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न; ATS कडून आंतरराज्यीय नेटवर्कचा पर्दाफाश