महाराष्ट्र

कांद्याची आवक वाढल्यानंतर निर्यातबंदी उठेल -डॉ. भारती पवार

कांदा निर्यातबंदी झाली असून लवकर याबाबत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल

Swapnil S

लासलगाव : कांद्याचे आगार म्हणून नाशिकची ओळख असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी झाली असून लवकर याबाबत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

लासलगावजवळील निमगाव वाकडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजननंतर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या की, “कांदा निर्यातबंदीचा निर्णय ७ डिसेंबर रोजी झाला, त्याचदिवशी याबाबत मी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांचे फोन येताहेत, याची माहिती त्यांना दिली होती. मीसुद्धा शेतकरी परिवारातील आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना जाणते. कांदा निर्यातबंदी उठली पाहिजे, यासाठी मी आग्रही आहे. लवकरच केंद्र सरकार निर्यातबंदीबाबत सकारात्मक निर्णय घेईल,” असे संकेत त्यांनी दिले. कांद्याची आवक वाढेल, त्याच वेळी कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी सरकार विचार करेल, असेही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या.

दिल्ली विधानसभा परिसरात सुरक्षाभंग; गेट तोडून अज्ञात कारचा शिरकाव, पुष्पगुच्छ ठेवून चालक फरार

Mumbai : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; आता १५ डब्यांच्या लोकल धावणार, विरार कारशेडमध्ये दाखल

Mumbai : 'माझ्या भावावर तलवारीने वार…'; मालाडमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी; एक तरुण गंभीर जखमी, पाच जण अटकेत

'ग्रीन आशा'ची सुरक्षित वाटचाल; होर्मुझमधून आठवे भारतीय LPG जहाज पार

तुम्ही खाताय ती किटकॅट चोरीची तर नाही? एका कोडने होईल सगळं उघड; अशी तपासा 'स्टोलन किटकॅट'