महाराष्ट्र

कांद्याची आवक वाढल्यानंतर निर्यातबंदी उठेल -डॉ. भारती पवार

कांदा निर्यातबंदी झाली असून लवकर याबाबत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल

Swapnil S

लासलगाव : कांद्याचे आगार म्हणून नाशिकची ओळख असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी झाली असून लवकर याबाबत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

लासलगावजवळील निमगाव वाकडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजननंतर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या की, “कांदा निर्यातबंदीचा निर्णय ७ डिसेंबर रोजी झाला, त्याचदिवशी याबाबत मी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांचे फोन येताहेत, याची माहिती त्यांना दिली होती. मीसुद्धा शेतकरी परिवारातील आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना जाणते. कांदा निर्यातबंदी उठली पाहिजे, यासाठी मी आग्रही आहे. लवकरच केंद्र सरकार निर्यातबंदीबाबत सकारात्मक निर्णय घेईल,” असे संकेत त्यांनी दिले. कांद्याची आवक वाढेल, त्याच वेळी कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी सरकार विचार करेल, असेही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या.

'बॅचलर्सना परवानगी नाही' म्हणत मालकिणीलाच घर खाली करायला सांगितलं; सोसायटी बोर्ड मेंबर्सना २२ वर्षांच्या तरुणीने शिकवला धडा

ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! वेळ आणि स्थळही सांगितलं; संजय राऊत यांची पोस्ट पुन्हा चर्चेत

राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीवर सुप्रिया सुळेंचे भाष्य; "ठाकरे बंधू एकत्र आले तर...

गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का! भरधाव Ferrari चा भीषण अपघात; Call of Duty गेमचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा मृत्यू - Video व्हायरल

BCCIचा मोठा निर्णय! महिला खेळाडूही होणार मालामाल; देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ