महाराष्ट्र

शेतकऱ्यांचा मोर्चा आज मंत्रालयावर धडकणार; विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संताप

राज्यभरातील शेतकरी आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने संतापले असून, सरकारचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बुधवारी मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चा काढणार आहेत.

Swapnil S

मुंबई : राज्यभरातील शेतकरी आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने संतापले असून, सरकारचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बुधवारी मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चा काढणार आहेत.

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी नेते सतीश इढोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, वीजबिल माफी, शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा यांसह विविध मागण्या गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. मात्र, या मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. यात राज्यभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत.

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांबद्दल आतापर्यंत विविध आंदोलने केली आहेत. उपोषण, रास्ता रोको, आत्महत्येच्या धमक्या आणि अवयव विक्रीसारख्या टोकाच्या पद्धतींचा अवलंब करूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

यासंदर्भात शेतकरी नेते सतीश इढोळे, बालाजी मोरे आणि विशाल गोटे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा अन्यथा मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

औद्योगिक जमिनींसाठी GST सारखी स्वतंत्र परिषद हवी; नियमात सुसूत्रता आणण्यासाठी 'सीआयआय'ची शिफारस

जम्मू-काश्मीर बस अपघात: उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

उत्तर कोरियाकडून समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्रांची चाचणी; आशियाई देशांमध्ये तणाव

मोदींकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

परतवाडा प्रकरणात होणार मोठा पर्दाफाश? आरोपींच्या ५ पैकी ३ मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश