महाराष्ट्र

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात ; तीन जणांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वसई पोलीस ताबडतोब दाखल झाले असून त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि ट्रक यांची धडक झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तीन जणांनी आपला प्राण गमावला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई सतीवली बजरंग हॉटेलसमोर हा अपघात घडला आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना एका कार चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि त्यानंतर कार डिव्हायडर क्रॉस करून विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. या अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत चालकासह दोन प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वसई पोलीस ताबडतोब दाखल झाले असून त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक