महाराष्ट्र

पुणे-बंगळूरु महामार्गावर भीषण अपघात ; बहीण भावासह तिघांचा जागीच मृत्यू

कराड तालुक्यातील पाचाड फाटा या ठिकाणी हा अपघात झाला आहे.

नवशक्ती Web Desk

पुणे-बंगळूरु महामार्गावर कराडजवळ भीषण अपघात घडला आहे. एका चारचाकी वाहनाने ट्रकला पाठिमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला असून यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मरण पावलेल्यांमध्ये बहीण भावाचा समावेश आहे. कराड तालुक्यातील पाचाड फाटा या ठिकाणी हा अपघात झाला आहे.

हा अपघात घडल्यानंतर काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वेगात आलेली चारचारी पुढे असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने मागूनच गाडीने ट्रकला धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

भारती जाधव, अभिषेक जाधव आणि नितीन पोवार असं या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अभिषेक हा मुंबई पोलिसात कार्यरत आहे.

अभिषेक जाधव, भारती जाधव आणि नितीन पोवार हे चारचाकी गाडीने मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी त्यांची गाडी कराड जवळील पाचवड फाटा परिसरात आली. या चारचाकीचा वेग जास्त होता. यावेळी समोरली ट्रकचा अंजाद न आल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट ट्रकला धडकली. या अपघाता तिघांचा जागीच मृत्यू झाला असून गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी