देवेंद्र फडणवीस  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

मोफत वीज योजना सुरूच राहणार - मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याची योजना पुढील पाच वर्षे चालू ठेवण्याचा सरकारचा निर्धार आहे.

Swapnil S

मुंबई : शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याची योजना पुढील पाच वर्षे चालू ठेवण्याचा सरकारचा निर्धार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासोबतच मोफत वीज देण्यासाठी होणाऱ्या खर्चाची भरपाई होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. कमी काळात योजनेची अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी ऊर्जा विभागाचे अभिनंदन केले.

फडणवीस यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित थ्री फेज वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेचे काम सुरू केले आहे. त्या अंतर्गत एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर ही शेतकऱ्यांना वीज देणारी देशातील पहिली कंपनी स्थापन केली आहे. १६ हजार मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मितीचे सौरऊर्जा प्रकल्पांचे काम सुरू केले.

विधिमंडळाचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन टायगर, पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी, विषारी दारूकांडाचे मुद्दे गाजणार

शिंदेंच्या नेतृत्वाखालील एकच शिवसेना अस्तित्वात; 'व्होट बँक 'वरून अमित शहांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

प्रवाशांचे हाल सुरूच; 'मेस्मा' अंतर्गत नोटीस जारी, बेस्ट कर्मचारी संपावर ठाम, 'नीट'च्या पार्श्वभूमीवर मध्यस्थी करण्याची मागणी

विनातिकीट प्रवास; किमान ५०० रुपये दंड, रेल्वेकडून नवीन नियमांची अंमलबजावणी सुरु

टॅक्सी, रिक्षा परवान्यांच्या कागदपत्रांची राज्यव्यापी पडताळणी सुरू; राज्य सरकारचा निर्णय