महाराष्ट्र

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

गणेशोत्सवात दरवर्षी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे नगर विकास विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवात दरवर्षी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे नगर विकास विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

२७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार ६ सप्टेंबरला विसर्जन होणार आहे. याकाळात कोकणातील गणेशभक्तांना यंदाही टोलमाफीची सुविधा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग, अटल सेतू आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोलनाक्यांवर ही सवलत दिली जाणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील अधिकाऱ्याने दिली.

अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची धामधूम आतापासूनच सुरू झाली आहे. कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो भाविक शहरातून कोकणात जातात. राजकीय लोकप्रतिनिधीकडून भाविकांसाठी दरवर्षी मोफत प्रवासाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मागील चार वर्षांपासून प्रवाशांना टोलमाफी जाहीर केली जाते. त्यासंदर्भातील पासेस उपलब्ध करून देण्यात येतात. यंदाच्या वर्षीही टोल माफी कधी जाहीर करणार याकडे गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सवाला अजून काही दिवसांचा अवधी असला तरी सरकारने टोल माफी देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच हा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकृत निर्णय जाहीर करतील, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

टोल माफीचे स्टिकर्स मिळणार

गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफी असलेले स्टीकर्स तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरले जातील. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वाहने राज्यातील ज्या जिल्ह्यातून येणार तेथील पोलीस ठाणे किंवा प्रादेशिक परिवहन खात्याकडे पास उपलब्ध करून दिले जातील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’