शेतकऱ्यांना दिलासा; आचारसंहितेतही कर्जमाफी योजना आणण्यास निवडणूक आयोगाची संमती  (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना दिलासा; आचारसंहितेतही कर्जमाफी योजना आणण्यास निवडणूक आयोगाची संमती

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी पुढे आली आहे. विधान परिषद निवडणुकीमुळे राज्यात लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडणार अशी चर्चा सुरू होती.

Swapnil S

मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी पुढे आली आहे. विधान परिषद निवडणुकीमुळे राज्यात लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेच्या अंमलबजावणीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला असून आगामी ३० जूनपूर्वीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा 'दिलासा' पोहोचण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असल्यामुळे निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू आहे. राज्य सरकारने यापूर्वीच पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करणे, बँकांकडून थकीत कर्जाचा तपशील मागवणे आणि आर्थिक तरतूद करण्याचे काम सुरू केले होते. मात्र आचारसंहितेमुळे या संपूर्ण प्रक्रियेवर पाणी फेरले जाण्याची भीती व्यक्त होत होती.

"२० जुलैपर्यंत जिवंत राहीन, नाहीतर भूत बनून परत येईन"; सोनम वांगचुक उपोषणावर ठाम

कल्याण-सीएसएमटी लोकलमध्ये डोंबिवलीहून 'डाउन' प्रवासामुळे राडा; महिलेने थेट पेपर स्प्रे फवारला

Mumbai : प्रस्तावित 'रेल्वे टर्मिनस' लटकले; रेल्वे, संरक्षण मंत्रालयात जमिनीचा वाद

Mumbai : आता कोस्टल रोडमध्ये बहुभाषिक फलक

बोगस पॅथॉलॉजिस्टची चौकशी होणार; NABL चा निर्णय