संग्रहित फोटो
महाराष्ट्र

मी महाराष्ट्रात फिरणारच - अजित पवार

महाराष्ट्रातील बहिणींनी बांधलेल्या राख्यांनी जे काही संरक्षण दिले आहे. हे राखीचे सुरक्षाकवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्रातील बहिणींनी बांधलेल्या राख्यांनी जे काही संरक्षण दिले आहे. हे राखीचे सुरक्षाकवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे, मी महाराष्ट्रात फिरणार, जीवाला धोका आहे की नाही याचा मी विचार करत नाही, पोलिसांनी त्याची काळजी घ्यावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

तळेगाव दाभाडे येथील जनसंवाद सभेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, अलीकडे गुप्तचर विभागाने मला एक निरोप पाठविला की माझ्या जीवाला धोका आहे. परंतु, मी महाराष्ट्रात फिरणार, जीवाला धोका आहे की नाही याचा मी विचार करत नाही, पोलिसांनी त्याची काळजी घ्यावी. महाराष्ट्रातील बहिणींनी बांधलेल्या राख्यांनी जे काही संरक्षण दिले आहे. हे राखीचे सुरक्षाकवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही. कारण, आम्ही कोणाचे वाईट केले नाही. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन काम केले. सरकारमध्ये असल्याने गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण देऊ शकलो.

दरम्यान, मुले होताना देवाची, अल्लाहाची काही कृपा नसते. नवऱ्याची कृपा असते म्हणून मुले होतात. लहान कुटुंब ठेवले तर योजनांचा फायदा होईल. मुलांना चांगले शिक्षण देऊ शकाल. स्वत:चे जीवन चांगल्या पद्धतीने जगता येईल. त्यामुळे सर्वांनी दोन मुलांवर थांबावे, असे आवाहन उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी केले.

गुलाबी रंग महिलांना आवडतो म्हणून मलाही आवडायला लागला. यात चुकीचे काय आहे. आम्ही वेडेवाकडे तर करत नाही ना? महिला लग्नात देखील इतक्या सुंदर दिसत नव्हत्या. इतक्या फेट्यात दिसत आहेत. नवरे देखील ओळखायचे नाहीत. फेटा घरी जाईपर्यंत काढू नका, फेटा घातल्यावर कोण कसा दिसतो, हे नवऱ्याला विचारा असेही ते उपस्थित महिलांना उद्देशून म्हणाले.

Mumbai : सोलर बाकावर मोबाईल चार्जिंग अन् वायफाय; पालिकेच्या उद्यानात उपक्रम

Mumbai : पार्ल्यात उड्डाणपुलाखाली पहिलाच शहरी शेती प्रकल्प; फळभाज्यांची लागवड, शहरी शेती अभ्यास वर्ग भरणार

धर्मांतराचे प्रकार खपवून घेऊ नका! देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश

Mumbai : वारसाहक्क वादावर निर्णय घेण्याचा गृहनिर्माण संस्थांना अधिकार नाही! उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ