महाराष्ट्र

‘नुकसानग्रस्त भागाची पाहणी म्हणजे जाहिरातबाजीवर मोठा खर्च’

अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Swapnil S

मुंबई : नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पाहणी केली. ही पाहणी म्हणजे इव्हेंट आणि जाहिरातबाजीवर ४००-४०० कोटींचा खर्च, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. दरम्यान, अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मराठवाडा आणि विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या भागात जाऊन पाहणी केली खरी पण ही पाहणी केवळ 'इव्हेंट' नसावा अशी आमची माफक अपेक्षा आहे. इव्हेंट आणि जाहिरातींसाठी हे सरकार ४००-४०० कोटी रुपये खर्च करत आहे, असे पाटील म्हणाले.

NEET-UG 2026 Re-Exam : विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेसाठी १५ मिनिटे अधिक, रफवर्कसाठी जास्त जागा; NTA च्या नव्या घोषणा

Mira Road : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मद्यपान करणाऱ्यांना मनसेचा दणका; VIDEO व्हायरल

हनिमूनला अख्खं कुटुंबच घेऊन गेला; पत्नीने थेट घटस्फोट मागितला

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mumbai : 'मीटरने चला' म्हटलं तर ३०० रुपयांची मागणी! BKC सार्वजनिक वाहतूक मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रिक्षाचालकांविरोधात तक्रारी