महाराष्ट्र

‘नुकसानग्रस्त भागाची पाहणी म्हणजे जाहिरातबाजीवर मोठा खर्च’

अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Swapnil S

मुंबई : नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पाहणी केली. ही पाहणी म्हणजे इव्हेंट आणि जाहिरातबाजीवर ४००-४०० कोटींचा खर्च, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. दरम्यान, अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मराठवाडा आणि विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या भागात जाऊन पाहणी केली खरी पण ही पाहणी केवळ 'इव्हेंट' नसावा अशी आमची माफक अपेक्षा आहे. इव्हेंट आणि जाहिरातींसाठी हे सरकार ४००-४०० कोटी रुपये खर्च करत आहे, असे पाटील म्हणाले.

BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

BMC Election : मुंबईच्या चाव्या महायुतीकडे; महापालिका निसटली, उद्धव ठाकरेंनी दिली कडवी झुंज

Maharashtra Local Body Election Results : राज्यात भाजपच ‘मोठा’ भाऊ; २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा कब्जा

BMC Election : मुंबईचे महापौरपद भाजपकडे तर शिंदेंचा उपमहापौर? २८ जानेवारीला महापौरपदाची निवडणूक

Thane : स्वबळाचा नारा काँग्रेसच्या अंगलट; ६० उमेदवारांना ‘भोपळा’ही फोडता आला नाही