महाराष्ट्र

‘नुकसानग्रस्त भागाची पाहणी म्हणजे जाहिरातबाजीवर मोठा खर्च’

अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Swapnil S

मुंबई : नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पाहणी केली. ही पाहणी म्हणजे इव्हेंट आणि जाहिरातबाजीवर ४००-४०० कोटींचा खर्च, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. दरम्यान, अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मराठवाडा आणि विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या भागात जाऊन पाहणी केली खरी पण ही पाहणी केवळ 'इव्हेंट' नसावा अशी आमची माफक अपेक्षा आहे. इव्हेंट आणि जाहिरातींसाठी हे सरकार ४००-४०० कोटी रुपये खर्च करत आहे, असे पाटील म्हणाले.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली