प्रातिनिधिक छायाचित्र 
महाराष्ट्र

शेतासाठीच्या वीज कुंपणाने घात केला! जळगावात एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी अंत

ग्रामीण भागात शेतातील पिकांचे जंगली प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेताला असलेल्या तारांमधून विद्युत प्रवाह सोडला जातो. एरंडोल तालुक्यात वरखेडी येथे एका शेतकऱ्याच्या शेत कुंपणात विद्युतप्रवाह सोडण्यात आला होता.

Swapnil S

जळगाव : एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथे शेताच्या कुंपणास लावलेल्या तारांमध्ये सोडण्यात आलेल्या विद्युत प्रवाहामुळे शेताजवळून जात असताना विजेचा शॉक बसून एकाच शेतमजूर कुटुंबातील दोन महिला, दोन लहान मुले व एक पुरूष अशा पाच जणांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ग्रामीण भागात शेतातील पिकांचे जंगली प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेताला असलेल्या तारांमधून विद्युत प्रवाह सोडला जातो. एरंडोल तालुक्यात वरखेडी येथे एका शेतकऱ्याच्या शेत कुंपणात विद्युतप्रवाह सोडण्यात आला होता. रोजगाराच्या शोधात मध्य प्रदेशातून आलेल्या दोन महिला, दोन लहान मुले व एक पुरूष असे पाच जणांचे शेतमजूर कुटुंब सकाळी या शेताजवळून जात असताना त्यांना वीजप्रवाह सोडल्याची कल्पना नव्हती. त्यामुळे या पाच जणांना विजेचा शॅाक बसला. त्यात दोन महिला, एक पुरूष आणि दोन लहान मुले अशा पाच जणांचा मृत्यू झाला.

विकास रामलाल पावरा (३५), त्यांची पत्नी सुमन(३०), मुले पवन व कंवल आणि एक वृध्द महिला यांचा मृतांमध्ये समावेश आहे. याप्रकरणी शेतमालक बंडू युवराज चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

...तर सरकारला कंपन्या बंद करण्याचे अधिकार; नवीन कामगार कायद्यानुसार कारवाई होणार, नागपूर स्फोटप्रकरणी कामगार मंत्र्यांची विधानसभेत माहिती

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

Mumbai : लाडकी सफाई कर्मचारी बहीण योजना; दरवर्षी BMC करणार सन्मान, सभागृहाची मंजुरी