महाराष्ट्र

किहीम किनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षण आणि पर्यटनाच्या दिशेने स्थानिक प्रशासनाचे मोठे पाऊल

किहीम बीचवर सध्या सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून, दिवसरात्र या कासवाचे संरक्षण केले जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने लोकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Swapnil S

अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनाऱ्यावर दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवाचे आगमन झाले आहे. हे कासव पर्यटकांनी पाहिले असून, स्थानिक प्रशासनाने तातडीने त्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या आहेत. सरपंच प्रसाद गायकवाड यांच्या पुढाकाराने या कासवाच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

किहीम बीचवर सध्या सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून, दिवसरात्र या कासवाचे संरक्षण केले जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने लोकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

ऑलिव्ह रिडले कासवांचा वावर हा परिसरातील पर्यावरणीय समतोलासाठी महत्त्वाचा असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने नागरिकांना विनंती केली आहे की, समुद्रकिनाऱ्यावर कासवाच्या जवळ न जाता, त्याच्या नैसर्गिक हालचालींमध्ये व्यत्यय आणू नये. ही घटना किहीमसाठी अभिमानाची असून, भविष्यातही अशी जैवविविधता जपण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जनजागृती करण्यासाठी उपक्रम

ऑलिव्ह रिडले कासव हे जगभर दुर्मिळ मानले जाते आणि भारतातील काही समुद्रकिनाऱ्यांवरच ते आढळते. किहीममध्ये अशा दुर्मिळ कासवाचे आगमन झाल्यामुळे या ठिकाणाच्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. स्थानिक प्रशासनाने या नैसर्गिक घटनेचा पर्यटन विकासासाठी योग्य वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात या भागात समुद्री जीवन आणि पर्यावरण संरक्षण याबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबवण्याचा विचार केला जात आहे.

विधान परिषद निवडणुकीत ९९.०२ टक्के मतदान; २२ जूनला मतमोजणी

मुंबई महापालिकेतही ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे सेनेचे २० ते २५ नगरसेवक संपर्कात; BMCतील गटनेते अमेय घोले यांचा दावा

टेलिग्राम बंदीवरून राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा; पेपर लीक माफियांवर कारवाई करा

मुंबई विमानतळाबाहेरील ‘मातम’ व्हिडीओवरून नवा वाद

Mumbai : दहिसर-भाईंदर उन्नत मार्गावरून खडाजंगी; २ हजार कोटींच्या प्रकल्पाचा भार मुंबईकरांवर का?, स्थायी समितीत सदस्यांचा सवाल