महाराष्ट्र

Maharashtra Assembly Winter Session : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत केल्या या मागण्या; म्हणाले...

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये सीमावाद प्रश्नावरून (Maharashtra Assembly Winter Session) मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

प्रतिनिधी

नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) दुसऱ्या आठवड्यात विधान परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र-कर्नाटक वादावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आहेत, असे सांगताच ते आक्रमक झाला आणि म्हणाले, "विधानसभेत आणि विधान परिषदेत सीमावादावत प्रस्ताव मांडायचे सोडून त्यांना दिल्लीत जाण्याची गरज होती का? दिल्लीमध्ये जाऊन मुख्यमंत्री सिमाप्रश्न मांडणार का?" असा सवाल उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले," एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत, तर इकडे आपले मुख्यमतनरी एकनाथ शिंदे हे सीमावादावर एक शब्ददेखील काढत नाहीत. महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांवर अत्याचार सुरू आहे. जेव्हा तेथील ग्रामपंचायतींनी महाराष्ट्रात जाण्याचा ठराव संमत केला, तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एवढंच नव्हे तर, त्या ग्रामपंचायतीदेखील बरखास्त करण्यात आल्या. आपल्या देशात काय मोगलाई आहे का?" अशी टीका त्यांनी यावेळी केली. पुढे विधान परिषदेत त्यांनी सीमावादावर तोडगा काढण्यासाठी गेले असताना मोरारजी देसाई यांच्या गाडीवर हल्ला केल्याची आठवणही सांगितली.

नवा प्राप्तिकर कायदा आजपासून लागू; करदात्यांना मोठा दिलासा

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्यातदारांना दिलासा; RoDTEP योजनेची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवली, वाचा सविस्तर

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी ३३ प्रश्नांची यादी प्रसिद्ध; स्थिर नातेसंबंधामधील जोडप्याला विवाहित जोडपे म्हणून गणले जाणार

Mumbai : 'फूल' बनू नका! १ एप्रिलनिमित्त पश्चिम रेल्वेची जनजागृती मोहीम; प्रवाशांना सुरक्षेचा संदेश

मुंबई महापालिकेत ‘महिलाराज’; महापौर, आयुक्त ते समिती अध्यक्षपदावर महिलांचेच वर्चस्व