मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

महाराष्ट्र भूषण पुरस्कार लवकरच जाहीर करणार; मानवी जीवन उंचावण्यासाठी होणार सन्मान -फडणवीस

कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

Swapnil S

मुंबई : कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ ' साठी राज्यातून प्राप्त शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' अंतिम निर्णय हा सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानभवन येथे 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' निवड समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य डॉ. अनिल काकोडकर, दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य अॅड उज्ज्वल निकम, डॉ. शशिकला वंजारी यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणा-या तसेच त्याव्दारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीला देण्यात येतो. 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०३४' पुरस्कारासाठी शासनाला प्राप्त शिफारस प्रस्तावापैकी एकाची निवड करणे अत्यंत कठीण काम आहे. पुरस्कार निवड समिती सदस्यांनी सुचविलेली नावे लक्षात घेवून असून लवकरच हे पुरस्कार सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून जाहीर करण्यात येतील.

BMC Election : मुंबई मनपा निवडणुकीची उद्या घोषणा?

Mumbai : गोरेगावच्या महाविद्यालयात ड्रेस कोडवरून वाद; विद्यार्थिनींच्या उपोषणानंतर बुरखा बंदी मागे

नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिलासा; ४७९ कंत्राटींना सेवेत कायम करा, न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

Badlapur Crime : ३ वर्षांनंतर सत्य उघडकीस; पतीनेच रचला महिला काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या हत्येचा डाव

पुणे-बंगळुरू महामार्गासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम; आ. डॉ. अतुल भोसले यांची लक्षवेधी; सहापदरीकरणाचा मुद्दा विधानसभेत गाजला