महाराष्ट्रातील EV विक्रीत १९ टक्के वाढ; तेल अनिश्चिततेमुळे EV गरज अधिक स्पष्ट 
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील EV विक्रीत १९ टक्के वाढ; तेल अनिश्चिततेमुळे EV गरज अधिक स्पष्ट

महाराष्ट्रात जानेवारी-फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ४५,१६८ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे, असे ‘क्लीन मोबिलिटी शिफ्ट’च्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३७,८४८ वाहने विकली गेली होती, त्या तुलनेत यंदा १९ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रात जानेवारी-फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ४५,१६८ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे, असे ‘क्लीन मोबिलिटी शिफ्ट’च्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३७,८४८ वाहने विकली गेली होती, त्या तुलनेत यंदा १९ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

सध्या सुरू असलेल्या पश्चिम आशियातील संघर्षाने इंधन पुरवठा साखळी किती असुरक्षित असू शकते आणि पेट्रोल-डिझेलपासून दूर जाणे का गरजेचे आहे, याची नव्याने जाणीव करून दिली आहे. ही वाढ प्रामुख्याने वैयक्तिक वाहनांच्या बाबतीत दिसून येत आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री ३४,५७० युनिट्सवर पोहोचली, तर एकट्या फेब्रुवारी महिन्यात राज्यभरात २०,१३५ ईव्हीची विक्री झाली (फेब्रुवारी २०२५ मध्ये ही संख्या १५,६४८ होती).

तीन चाकीमध्ये कमी वाढ

व्यावसायिक विभागातील मालवाहतूक आणि सामायिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक तीन-चाकी वाहनांच्या विक्रीत फारशी वाढ झालेली नाही. या कालावधीत त्यांची विक्री ३,२७८ वरून केवळ ३,३६८ युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. सध्या ईव्ही स्थित्यंतर हे घरगुती पातळीवर होत आहे; मालवाहतूक किंवा सामायिक वाहतूक क्षेत्रात अद्याप अपेक्षित बदल दिसत नाही, जिथे इंधन आयातीचा भार तुलनेने अधिक आहे. राज्य सरकारने ‘विद्युत वाहन धोरण २०२५’ अंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी खासगी व सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहतुकीला चालना देण्यासाठी २४६ कोटींची तरतूद केली आहे. उद्योगांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी अनुदानाचे प्रमाण अपुरे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

राज्यातील ईव्ही विक्री

एकूण ईव्ही विक्री

(जानेवारी-फेब्रुवारी):

२०२५ → ३७,८४८

२०२६ → ४५,१६८ (+१९%)

व्यावसायिक/सामायिक (३-चाकी):

२०२५ → ३,२७८

२०२६ → ३,३६८ (+२.७%)

प. आशियातील संकटाचा पुरवठा साखळीवर होणारा परिणाम केवळ ईव्हीपुरता मर्यादित नसून संपूर्ण वाहन क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. मध्यम ते दीर्घ कालावधीत, तेलाचे संकट हे अंतर्गत ज्वलन इंजिन वाहनांकडून विद्युत वाहनांकडे जाण्याच्या गरजेला अधिक बळ देत आहे.
सिद्धार्थ श्रीनिवास, समन्वयक, क्लीन मोबिलिटी कलेक्टिव्ह, इंडिया
जागतिक अनिश्चितता आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे ईव्हीचा अवलंब करणे ही काळाची गरज ठरेल. सरकारने अनुदान वाढवायला हवे आणि ईव्हीच्या वापराला अधिक आक्रमकपणे प्रोत्साहन दिले पाहिजे.
नितीन दोसा, अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन

Mumbai : दुसरी लाईफलाइन ठरतेय ‘काळ’...वर्षभरात ‘बेस्ट’च्या धडकेत ३२ जणांचा मृत्यू

साखरपुड्याच्या आनंदावर विरजण! जळगावात कार-एसटी-दुचाकीचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा अंत, दुचाकीस्वारही ठार

मे महिन्यात ईव्ही विक्रीचा नवा विक्रम; देशात विजेवरील वाहनांच्या लोकप्रियतेत वाढ

Mumbai : पीओपी मूर्तींवर तत्काळ बंदी नको; बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी

Dadar BEST Bus Accident : घरात लग्नाची तयारी, बहिणीच्या संसाराचीही स्वप्नं; पण क्षणात सर्व संपलं, २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू