महाराष्ट्र

ही भाषा महाराष्ट्र सहन करणार नाही; संजय राऊत यांचा इशारा

कोल्हापूरमधील चंदगड येथील सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर गादीचे खरे वारसदार नाहीत असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई :

कोल्हापूरची शाहू महाराजांची गादी ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे. त्या गादी विषयी महाराष्ट्रातील जनतेला अपार आदर आणि श्रद्धा आहे. निवडणुकीत पायाखालची वाळू सरकतेय, हे समजल्यावर महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक केली जात आहे. शाहू महाराज हे आधीपासून सामाजिक कार्यात आहेत. कोल्हापूरच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी संजय मंडलिक यांनी वापरलेली भाषा महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी दिला.

कोल्हापूरमधील चंदगड येथील सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर गादीचे खरे वारसदार नाहीत असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.  त्यासंदर्भात संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती शाहू महाराज हे वारसदार नाहीत, मग संजय मंडलिक वारसदार आहेत का? असा सवाल करतानाच संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक हे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापुरातील राजकारणात काम करत होते. कोल्हापूरची शाहू महाराजांची गादी ही शिवाजी महाराजांची गादी आहे. अशावेळी महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक करणे हे लक्षण चांगलं नाही, असे राऊत म्हणाले. दरम्यान, प्रचारादरम्यान महायुतीच्या उमेदवारांकडून मतदारांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि आमिषांची देशाच्या आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी करत हे चित्र लोकशाहीसाठी मारक असल्याचे राऊत म्हणाले.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत