महाराष्ट्र

महायुतीच्या मंत्र्यांची मंगळवारी विशेष बैठक; शेतपिकाचे नुकसान, आगामी निवडणुकीवर होणार चर्चा

राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला ६० लाख हेक्टरच्यावर नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर आजारांचे संकट आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला ६० लाख हेक्टरच्यावर नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर आजारांचे संकट आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही बैठक पार पडणार असून महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुखासह मंत्र्यांना हजर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने फटका दिला असून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीची जोरदार मागणी लावून धरली आहे.

विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त

कोकण हापूसवर गुजरातचा दावा; मानांकनावरून पेटला नवा वाद…; बागायतदार-विक्रेत्यांचा कायदेशीर लढ्याचा इशारा!

IndiGo ची ६५० उड्डाणे रद्द; १,६५० उड्डाणे सुरू झाल्याचा कंपनीचा दावा

दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना ३० कोटीच्या फसवणूकप्रकरणी अटक

सप्तश्रृंगीगडाजवळ भीषण अपघात; इनोव्हा कार थेट दरीत; ६ भाविकांचा मृत्यू