महाराष्ट्र

महायुतीच्या मंत्र्यांची मंगळवारी विशेष बैठक; शेतपिकाचे नुकसान, आगामी निवडणुकीवर होणार चर्चा

राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला ६० लाख हेक्टरच्यावर नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर आजारांचे संकट आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला ६० लाख हेक्टरच्यावर नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर आजारांचे संकट आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही बैठक पार पडणार असून महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुखासह मंत्र्यांना हजर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने फटका दिला असून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीची जोरदार मागणी लावून धरली आहे.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल