महाराष्ट्र

महायुतीच्या मंत्र्यांची मंगळवारी विशेष बैठक; शेतपिकाचे नुकसान, आगामी निवडणुकीवर होणार चर्चा

राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला ६० लाख हेक्टरच्यावर नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर आजारांचे संकट आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला ६० लाख हेक्टरच्यावर नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर आजारांचे संकट आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही बैठक पार पडणार असून महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुखासह मंत्र्यांना हजर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने फटका दिला असून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीची जोरदार मागणी लावून धरली आहे.

BMCचा मोठा निर्णय : अधिकृत फेरीवाल्यांना मिळणार QR कोड प्रमाणपत्र; बेकायदेशीर विक्रेत्यांना मोठा इशारा

BMC Budget 2026: ९० मिनिटांचा प्रवास आता फक्त २० मिनिटांत; मेगा रोड प्रोजेक्ट्समुळे मुंबईकरांना फायदा

Mumbai : राणीबागेत लवकरच गुजरातच्या सिंहाची गर्जना; सिंहाच्या मागणीसाठी मुंबईच्या महापौरांचे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

Mumbai : प्रवाशांना दिलासा! विधानभवन मेट्रो स्थानकाचे B-४ गेट सुरू; B-५ वर निर्बंध कायम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

मातृत्वाला काळिमा! रडणाऱ्या तान्ह्या बाळाच्या तोंडात कोंबला कापडाचा बोळा अन् जिवंत जाळलं