महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी; राज्यात नव्या वादाला सुरुवात

भाजपचे नेते आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्यावर आता राज्यभरातून टीका होऊ लागली आहे

प्रतिनिधी

एकीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरु असताना भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. प्रतापगडावर शिवप्रताप दिनाचा कार्यक्रम सुरु असताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्यात कैद करुन ठेवले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले, पण तेदेखील महाराष्ट्रासाठी बाहेर पडले." यावरून आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

विरोधीपक्ष नेते अजित पवार टीका करताना म्हणाले की, 'या वाचाळवीरांना यावर. एकाला ठेच लागल्यानंतर दुसरा शहाणा होतो. पण यांच्यामध्ये स्पर्धाच लागली आहे. महाराजांची तुलना कधी होऊ शकते का?' असा सवाल केला. तर, आदित्य ठाकरे यांनी टीका करताना म्हंटले की, ते चुकून बोलले की ओघात बोलून गेले हे मला पटण्यासारखे नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराजांचा अपमान हा भाजपचा एककलमी कार्यक्रम झाला आहे.

तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; २९ ते ३१ जुलैदरम्यान जोर वाढण्याची शक्यता

कामगिरी सुधारा, अन्यथा बाजूला व्हा! निष्क्रिय मंत्र्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

व्हिडीओचा नव्हे, 'दिल का अँगल' बदला; प्रियांकांचा मोदींना खोचक सल्ला, परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा

कठोर कारवाई नको! दिल्ली आंदोलनप्रकरणी 'सर्वोच्च' दिलासा; १८ वर्षांखालील मुलांची तत्काळ सुटका करण्याचे निर्देश

Nashik : शालार्थ आयडी घोटाळा; संजय गरुड याला अटक