महाराष्ट्र

मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

Swapnil S

जालना : सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

राज्य सरकारने आरक्षणाच्या प्रशनावर दिलेले आश्वासन पाळले नसल्याने आपल्याला बेमुदत उपोषण सुरू करावे लागत आहे, असे जरांगे म्हणाले. यापूर्वी त्यांनी १३ जून रोजी आपले बेमुदत उपोषण स्थगित केले होते. समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी जरांगे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली होती.

सरकारने आपला शब्द पाळला नाही. त्यामुळे आपल्याला बेमुदत उपोषणाला बसावे लागत आहे. मृत्यू येईपर्यंत उपोषण सुरू ठेवले जाणार आहे. २९ ऑगस्ट रोजी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली जाणार असून त्यामध्ये विधानसभेची आगामी निवडणूक लढवायची की नाही याबाबत मराठा समाज निर्णय घेणार आहे.

बेमुदत उपोषणादरम्यान ७ ते १३ ऑगस्ट या कालावधीत जरांगे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. रुग्णवाहिकेतून दौरा करून आपण सभांना संबोधित करणार आहोत. त्यानंतर १४ ते २० ऑगस्ट या कालावधीत अंतरवाली सराटी येथे बैठकांची मालिका आयोजित करण्यात आली असून त्यावेळी विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली जाणार आहे. उमेदवार उभा करण्याविरुद्ध समाजाने निर्णय घेतला तर आपण उमेदवार उभा करणार नाही, मात्र त्यानंतर मराठ्यांच्या आरक्षणाला जे विरोध करीत आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी काम सुरू करणार आहोत, तर आरक्षणला समर्थन देणारे उमेदवार कसे निवडून येतील हेही पाहू, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

विधानसभेच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवार कोण असतील त्यांची माहिती गोळा करावी, म्हणजे १४ ते २० ऑगस्ट या कालावधीत त्या उमेदवारांबाबत चर्चा करणे शक्य होईल, अशी विनंतीही जरांगे यांनी मराठा समाजाला केली. सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या आंदोलनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. महायुतीला आपण २८८ उमेदवार उभे करावे असे वाटते तर महाविकास आघाडीला आपण पाठिंबा द्यावे असे वाटते, मात्र आपल्याला त्यांच्या युक्त्या माहिती आहेत. आपण त्यांची योजना यशस्वी होऊ देणार नाही, असेही जरांगे म्हणाले.

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन