महाराष्ट्र

ओला दुष्काळ जाहीर होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही; दसरा मेळाव्यात मनोज जरांगे यांचा इशारा

महाराष्ट्र सरकारने पूरबाधित भागांत दिवाळीपूर्वी ‘ओला दुष्काळ’ जाहीर न केल्यास निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा, शेतकऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल दर महिन्याला सरकारकडून वेतन दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र सरकारने पूरबाधित भागांत दिवाळीपूर्वी ‘ओला दुष्काळ’ जाहीर न केल्यास निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा, शेतकऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल दर महिन्याला सरकारकडून वेतन दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली.

बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे दसऱ्यानिमित्त झालेल्या सभेत ते म्हणाले की, गेल्या दोन आठवड्यांत मराठवाडा-छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर, नांदेड, जालना, हिंगोली, परभणी आणि बीड या जिल्ह्यांना तीव्र पावसामुळे फटका बसला. सरकारने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पूर्ण कर्जमाफी आणि नोकऱ्या द्याव्यात. या मागण्या दिवाळीपूर्वी पूर्ण झाल्या नाहीत, तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

शेतीला (सरकारी) नोकरीचा दर्जा द्यावा आणि शेतकऱ्यांना दर महिन्याला पैसे देणे सुरू करावे. प्रभावित शेतकऱ्यांसाठी निधी गोळा करण्यासाठी सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून २५ टक्के रक्कम कपात करावी.

इंग्रज तुमच्या घरचे होते काय?

मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर आम्हाला गुलाम म्हणता, गुलामाचे गॅझेट लागू केले म्हणता, मग इंग्रज काय तुमच्या घरचे होते का? असा परखड सवाल मनोज जरांगे यांनी विचारला.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग