महाराष्ट्र

ओला दुष्काळ जाहीर होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही; दसरा मेळाव्यात मनोज जरांगे यांचा इशारा

महाराष्ट्र सरकारने पूरबाधित भागांत दिवाळीपूर्वी ‘ओला दुष्काळ’ जाहीर न केल्यास निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा, शेतकऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल दर महिन्याला सरकारकडून वेतन दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र सरकारने पूरबाधित भागांत दिवाळीपूर्वी ‘ओला दुष्काळ’ जाहीर न केल्यास निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा, शेतकऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल दर महिन्याला सरकारकडून वेतन दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली.

बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे दसऱ्यानिमित्त झालेल्या सभेत ते म्हणाले की, गेल्या दोन आठवड्यांत मराठवाडा-छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर, नांदेड, जालना, हिंगोली, परभणी आणि बीड या जिल्ह्यांना तीव्र पावसामुळे फटका बसला. सरकारने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पूर्ण कर्जमाफी आणि नोकऱ्या द्याव्यात. या मागण्या दिवाळीपूर्वी पूर्ण झाल्या नाहीत, तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

शेतीला (सरकारी) नोकरीचा दर्जा द्यावा आणि शेतकऱ्यांना दर महिन्याला पैसे देणे सुरू करावे. प्रभावित शेतकऱ्यांसाठी निधी गोळा करण्यासाठी सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून २५ टक्के रक्कम कपात करावी.

इंग्रज तुमच्या घरचे होते काय?

मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर आम्हाला गुलाम म्हणता, गुलामाचे गॅझेट लागू केले म्हणता, मग इंग्रज काय तुमच्या घरचे होते का? असा परखड सवाल मनोज जरांगे यांनी विचारला.

पाकिस्तानची पुन्हा पोलखोल! ऑपरेशन सिंदूरमध्ये F-16 सह ४ ते ५ लढाऊ विमाने भारताने पाडली; भारतीय हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा

SRA चा कॉर्पस फंड १ लाख! झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव; इमारतींच्या उंचीप्रमाणे रकमेत होणार वाढ

डायग्नोस्टिक लॅब्ससाठी नवीन कायदा; चाचण्यांची अचूकता व विश्वासार्हता राखण्यासाठी सरकारचे पाऊल

...तर ओला, उबरवर कारवाई

‘सावरकर सदन’ला वारसा स्थळाचा दर्जा; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश