महाराष्ट्र

Maratha Reservation :आरक्षणासाठी अजूनं एकानं संपवलं जीवन ; हिंगोलीत तरुणाची आत्महत्या...

एवढेच नव्हे तर लोकं आरक्षणासाठी आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल देखील उचलत आहेत.

नवशक्ती Web Desk

मराठा आरक्षणासाठी राज्यात वणवा पेटला आहे. संपूर्ण राज्यभरात जाळफोड, तोडफोड, उपोषण,प्रचार आणि मोर्चे सुरु आहेत. एवढेच नव्हे तर लोकं आरक्षणासाठी आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल देखील उचलत आहेत. तरी सरकारनं अद्यापि काही ठोस निर्णय घेतला नाही आहे. दरम्यान राज्यातील आत्महत्यांच्या संख्येत अधिकच वाढ होत आहे. अशातच आता हिंगोलीतील नहाद गावामध्ये 21 वर्षीय तरुणानं आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. नहाद गावातील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय गोविंद कावळे या तरुणानं चिठ्ठी लिहतं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे, असं सांगितलं आहे. गावाजवळ असलेल्या विहिरीत त्यानं उडी मारली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी गोविंद कावळेने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत म्हटलं आहे की, मी माझ्या शिक्षणापासून दूर राहिलो आहे. तरीही महाराष्ट्र शासन आम्हाला मराठा आरक्षण देत नाही. म्हणून मी आत्महत्या करत आहे. सध्या पोलीस ताबोडतोब घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे.

जरांगे यांनी मराठा समाजाला वारंवार सांगत आले आहेत की, आत्महत्या करू नका, एकजुटीनं राहा, तोडफोड करू नये उपोषण करा शांततेच्या मार्गाने आपल्याला आरक्षण हवे आहे, तरीही मराठा समाज निराश होऊन टोकाचं पाऊल उचलत आहे.

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार

शिवसेना नाव, चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश

विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नसल्याचा लगेच निष्कर्ष काढू नका! AAIB अहवालावर एअर इंडियाच्या ‘सीईओं’चे विधान