महाराष्ट्र

राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार- जयंत पाटील

पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी शिंदे सरकार आणि राज्यपालांवर टीकास्त्र सोडले

वृत्तसंस्था

शिवसेनेतील संघर्ष सुप्रीम कोर्टात गेला आहे. कोर्टाने पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या आमदारांना निलंबित केल्यास एकनाथ शिंदे सरकार कोसळेल आणि त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असे भाकित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.मध्यावधी निवडणुका गृहीत धरून राष्ट्रवादीची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी शिंदे सरकार आणि राज्यपालांवर टीकास्त्र सोडले. ‘‘शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बहुमत चाचणी करायला राज्यपालांनी त्यांना भाग पाडले,’’ असा गंभीर आरोप पाटील यांनी केला.

‘‘गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यामुळे मोठं नुकसान झालं. आझाद हे काँग्रेसचे मोठे नेते होते. त्यांची जम्मू-काश्मिरात घट्ट पकड होती. त्यामुळे अंतर्गत वादामुळे आझाद बाहेर पडले असतील, त्याचा फटका हा काँग्रेस सोबत राष्ट्रवादीला बसल्याची कबुली त्यांनी दिली.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले