महाराष्ट्र

राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार- जयंत पाटील

पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी शिंदे सरकार आणि राज्यपालांवर टीकास्त्र सोडले

वृत्तसंस्था

शिवसेनेतील संघर्ष सुप्रीम कोर्टात गेला आहे. कोर्टाने पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या आमदारांना निलंबित केल्यास एकनाथ शिंदे सरकार कोसळेल आणि त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असे भाकित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.मध्यावधी निवडणुका गृहीत धरून राष्ट्रवादीची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी शिंदे सरकार आणि राज्यपालांवर टीकास्त्र सोडले. ‘‘शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बहुमत चाचणी करायला राज्यपालांनी त्यांना भाग पाडले,’’ असा गंभीर आरोप पाटील यांनी केला.

‘‘गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यामुळे मोठं नुकसान झालं. आझाद हे काँग्रेसचे मोठे नेते होते. त्यांची जम्मू-काश्मिरात घट्ट पकड होती. त्यामुळे अंतर्गत वादामुळे आझाद बाहेर पडले असतील, त्याचा फटका हा काँग्रेस सोबत राष्ट्रवादीला बसल्याची कबुली त्यांनी दिली.

आजचे राशिभविष्य, २० मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Ramadan 2026 : इफ्तारसाठी गोड ट्विस्ट! घरीच बनवा केसर पिस्ता बासुंदी; वाचा साहित्य आणि टिप्स

Chaitra Navratri 2026 : उपवासात हेल्दी राहायचंय? 'हे' सुपरफूड्स खा, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांचा सल्ला

कच्चं बीट रोज खाताय? थांबा! आधी हे जाणून घ्या; नाहीतर पोटाचे त्रास वाढू शकतात

बाजारच्या आईस्क्रीमला द्या ब्रेक; घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मटका कुल्फी