महाराष्ट्र

राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार- जयंत पाटील

पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी शिंदे सरकार आणि राज्यपालांवर टीकास्त्र सोडले

वृत्तसंस्था

शिवसेनेतील संघर्ष सुप्रीम कोर्टात गेला आहे. कोर्टाने पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या आमदारांना निलंबित केल्यास एकनाथ शिंदे सरकार कोसळेल आणि त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असे भाकित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.मध्यावधी निवडणुका गृहीत धरून राष्ट्रवादीची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी शिंदे सरकार आणि राज्यपालांवर टीकास्त्र सोडले. ‘‘शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बहुमत चाचणी करायला राज्यपालांनी त्यांना भाग पाडले,’’ असा गंभीर आरोप पाटील यांनी केला.

‘‘गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यामुळे मोठं नुकसान झालं. आझाद हे काँग्रेसचे मोठे नेते होते. त्यांची जम्मू-काश्मिरात घट्ट पकड होती. त्यामुळे अंतर्गत वादामुळे आझाद बाहेर पडले असतील, त्याचा फटका हा काँग्रेस सोबत राष्ट्रवादीला बसल्याची कबुली त्यांनी दिली.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली