महाराष्ट्र

शेतकरी दुःखात, पण मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर; ठाकरे गटाच्या 'या' नेत्याने केली टीका

प्रतिनिधी

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २ दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर असताना दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. "एकीकडे शेतकरी अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेला असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा कितपत योग्य?" असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच, ठाकरे गटाचे नेते अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार आहेत.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, "महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी दु:खात आहेत. असे असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौरा करत आहेत." अशी टीका केली. तसेच, "शिवसेना ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत." असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, "गेल्या महिन्याभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटदेखील झाली आहे. मात्र, अद्याप पंचनामे झाले नाहीत. राज्यातील जनता जर सुखी नसेल, तर विमानाने देवाच्या दर्शनासाठी जाणे हे पटते का?" अशी टीका त्यांनी केली.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर