ANI
महाराष्ट्र

नाना पटोलेंनी राज्य सरकारच्या हिंदुत्वावर केली टीका

हिंदूंचे सरकार आले आणि आनंदाने सण साजरे करणाऱ्यांच्या राज्यात हिंदू शेतकरी मदतीपासून वंचित असल्याची टीका काँग्रेसने केली

वृत्तसंस्था

राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील ईडी सरकार केवळ हिंदूंच्या हिताचे नाटक करत आहे. खरे तर हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले आणि आनंदाने सण साजरे करणाऱ्यांच्या राज्यात हिंदू शेतकरी मदतीपासून वंचित असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना राज्य सरकारने केवळ मदत जाहीर केली, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सध्याचे सरकार केवळ दिखावा आहे या सरकारला शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. आजही पंचनामा सुरू आहे. अशा कार्यक्रमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे ते म्हणाले.

कृषीमंत्री हे शेती आणि शेतकऱ्यांचे जाणकार असले पाहिजेत पण सध्याच्या कृषीमंत्र्यांच्या बाबतीत तसे नाही. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही, त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कसे कळणार? असा सवाल पटोले यांनी केला. कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, असा त्यांचा अंदाज असेल तर तो साफ चुकीचा आहे, असेही ते म्हणाले.

रायगडात महायुतीचे नवे राजकीय समीकरण; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर शिंदेसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र

शास्ती माफ योजनेस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालिकेच्या तिजोरीत एका दिवसात १३.५० कोटींची भर

Iran vs US-Israel War : होर्मुझवर इराणची घट्ट पकड, युद्ध आणखी भडकणार? मध्यपूर्वेतील युद्धात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता

अनुदानित चिनी, इंडोनेशियन पेपरबोर्ड आयातीविरुद्ध चौकशी; देशांतर्गत उद्योगांवर परिणाम होत असल्याने भारताने उचलले पाऊल

मुंबईत ४० जणांना हवंय इच्छामरण; देशातील हरीश राणाच्या पहिल्या प्रकरणानंतर BMC वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर