ANI
महाराष्ट्र

नाना पटोलेंनी राज्य सरकारच्या हिंदुत्वावर केली टीका

हिंदूंचे सरकार आले आणि आनंदाने सण साजरे करणाऱ्यांच्या राज्यात हिंदू शेतकरी मदतीपासून वंचित असल्याची टीका काँग्रेसने केली

वृत्तसंस्था

राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील ईडी सरकार केवळ हिंदूंच्या हिताचे नाटक करत आहे. खरे तर हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले आणि आनंदाने सण साजरे करणाऱ्यांच्या राज्यात हिंदू शेतकरी मदतीपासून वंचित असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना राज्य सरकारने केवळ मदत जाहीर केली, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सध्याचे सरकार केवळ दिखावा आहे या सरकारला शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. आजही पंचनामा सुरू आहे. अशा कार्यक्रमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे ते म्हणाले.

कृषीमंत्री हे शेती आणि शेतकऱ्यांचे जाणकार असले पाहिजेत पण सध्याच्या कृषीमंत्र्यांच्या बाबतीत तसे नाही. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही, त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कसे कळणार? असा सवाल पटोले यांनी केला. कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, असा त्यांचा अंदाज असेल तर तो साफ चुकीचा आहे, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग