महाराष्ट्र

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या व्यक्तव्यामुळे राज्यात नवे वादंग

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे एक विधान सध्या वादाचे कारण ठरत आहे.

वृत्तसंस्था

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे एक विधान सध्या वादाचे कारण ठरत आहे. ते म्हणाले, ''गुजराती आणि राजस्थानी लोकांना मुंबईतून काढून टाकले तर येथे एक पैसाही शिल्लक राहणार नाही''. त्यांचे हे विधान वादग्रस्त आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये भगतसिंग कोश्यारी यांच्यावर मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप आहे. शुक्रवारी (२९ जुलै) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत जे.पी. चौकाचे नामकरण आणि उद्घाटन समारंभ अंधेरी पश्चिम मुंबई रोडवरील दाऊद बाग जंक्शन येथे झाला. या चौकाला स्वर्गीय शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “कधी कधी मी महाराष्ट्रातील जनतेला सांगतो की, जर तुम्ही गुजराती आणि राजस्थानींना मुंबई आणि ठाण्यातून हटवले तर तुमच्याकडे एकही पैसा उरणार नाही. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना वगळले तर मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही.

जेपी रोड, अंधेरी पश्चिम मुंबईचे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर, पंकज भोयर, कोरिओग्राफर रेमो डिसोझा आणि उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी या चौकाच्या नामकरण आणि उद्घाटन समारंभाला प्रामुख्याने उपस्थित होते.

सचिन सावंत म्हणाले, “राज्याचे राज्यपाल त्याच राज्यातील जनतेची बदनामी करतात हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी राहूद्या यांनाच आधी नारळ द्यावा. त्यांच्या राजवटीत राज्यपालांच्या संस्थानाचा दर्जा आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा दर्जा तर घसरलाच पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने होत आहे.

Mumbai : प्रवाशांची होणार गैरसोय; उद्या पश्चिम व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Iran vs US-Israel War: तेल पुरवठ्यात अस्थिरता; इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला

Mumbai : धक्कादायक! वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला झाडूने मारहाण; Video व्हायरल होताच संतापाची लाट

Mumbai : उद्धव ठाकरे यांच्याकडून एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सचा शुभारंभ; काय आहे खास? फी किती? जाणून घ्या

Iran vs US-Israel War: पत्नीशी फोनवर बोलताना मोठा स्फोट! सौदीतील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू