महाराष्ट्र

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या व्यक्तव्यामुळे राज्यात नवे वादंग

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे एक विधान सध्या वादाचे कारण ठरत आहे.

वृत्तसंस्था

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे एक विधान सध्या वादाचे कारण ठरत आहे. ते म्हणाले, ''गुजराती आणि राजस्थानी लोकांना मुंबईतून काढून टाकले तर येथे एक पैसाही शिल्लक राहणार नाही''. त्यांचे हे विधान वादग्रस्त आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये भगतसिंग कोश्यारी यांच्यावर मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप आहे. शुक्रवारी (२९ जुलै) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत जे.पी. चौकाचे नामकरण आणि उद्घाटन समारंभ अंधेरी पश्चिम मुंबई रोडवरील दाऊद बाग जंक्शन येथे झाला. या चौकाला स्वर्गीय शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “कधी कधी मी महाराष्ट्रातील जनतेला सांगतो की, जर तुम्ही गुजराती आणि राजस्थानींना मुंबई आणि ठाण्यातून हटवले तर तुमच्याकडे एकही पैसा उरणार नाही. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना वगळले तर मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही.

जेपी रोड, अंधेरी पश्चिम मुंबईचे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर, पंकज भोयर, कोरिओग्राफर रेमो डिसोझा आणि उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी या चौकाच्या नामकरण आणि उद्घाटन समारंभाला प्रामुख्याने उपस्थित होते.

सचिन सावंत म्हणाले, “राज्याचे राज्यपाल त्याच राज्यातील जनतेची बदनामी करतात हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी राहूद्या यांनाच आधी नारळ द्यावा. त्यांच्या राजवटीत राज्यपालांच्या संस्थानाचा दर्जा आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा दर्जा तर घसरलाच पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने होत आहे.

Mumbai : २३८ एसी लोकल ४ वर्षे आधीच मिळणार; तीन कारखान्यांत एकाच वेळी उत्पादन; नवी लोकल पुढील वर्षी होणार दाखल

मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेवर 'जीन्सराज'; महामार्गच बनला 'जीन्स सुकवण्याचा अड्डा'!

Baramati : "बी. फार्मसीचं शिक्षण घेतलंय, पण नोकरी करू देत नव्हता"; पतीला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा खुलासा

'डीजे लावणी', अश्लील डान्सवर तातडीने बंदी घाला! चित्रपट महामंडळाची सरकारकडे मागणी

बस्तर सफरीवर निघालेल्या मुंबईच्या २४ वर्षीय बायकरचा अपघातात मृत्यू; १५ तासांपूर्वी केली होती 'लेट्स एक्सप्लोर बस्तर' पोस्ट