Twitter/@VijayWadettiwar
महाराष्ट्र

हमीभाव नाही, १ रुपयांत पीक विमा, शेतकऱ्यांची फसवणूक; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

विधानसभेत २९३ अन्वये हरकतीचा मुद्दा उपस्थित केला

Swapnil S

मुंबई : हमीभाव नाही, शेतमाल खरेदी करायचा नाही, १ रुपयांत पिक विमा कागदावरच, संपूर्ण कर्ज माफी, वीज बिल माफ महायुतीच्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी विधानसभेत सत्ताधारी पक्षावर केला. २९३ अन्वये वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित करत शेतकरी आसमानी संकटात असताना महायुतीमुळे सुलतानी संकटात शेतकरी सापडला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

सरसकट कर्ज माफी, वीज बिल माफ, छावण्याची दुरवस्था, जनावरांसाठी दिवसभरात फक्त एक लिटर पाणी, अवकाळी पावसामुळे ११ हेक्टर जमीनीचे नुकसान झाले. हरिप हंगाम वाईट गेला, केंद्र सरकारने गेल्या वर्षी ही शेतकऱ्यांना मदत केली नाही, असे ही ते म्हणाले. युरीया खत आधी ५० किलोची बॅग २,२६० रुपयांत मिळत होती, त्यात वाढ करत आता २,४६० रुपयांना युरिया खताची बॅग मिळते. मात्र आता ५० किलो ऐवजी ४० किलोची बॅग केली, यात १० किलो कोणाच्या खिशात घातले, असा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

सोन्यावर २ टक्के जीएसटी, हिऱ्यावर ३ टक्के जीएसटी मात्र शेतकऱ्यांसाठी मुख्य साहित्य असलेल्या ट्रॅक्टर वर १८ टक्के जीएसटी याचा अर्थ महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी काही घेणं देणं नाही, असा टोला त्यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला.

आज विरोधात तुम्हाला शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. परंतु सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची जाण असू द्या, अशी टीका विधान सभा सदस्य बच्चू कडू यांनी वडेट्टीवार यांच्यावर केली.

Mumbai : नालेसफाईचे काम अनुभव नसलेल्या कंत्राटदारांनाही; नालेसफाई रखडल्यामुळे महापौरांचा अजब निर्णय

राज्यात गॅस, इंधनाचा पुरेसा साठा आहे; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे भुजबळांचे आवाहन

Mumbai : महापौरांचा VIP थाट कायम! मोटारीवर लखलखणार दिवे

२४ अनधिकृत नर्सिंग होम्सवर कारवाईचा बडगा; जन्म नोंदणी फॉर्म देणे बंद; बनावट प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर BMC चा कठोर पवित्रा

BMC सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करा! ठाकरे सेनेच्या अंकित प्रभू यांची सूचना