Twitter/@VijayWadettiwar
महाराष्ट्र

हमीभाव नाही, १ रुपयांत पीक विमा, शेतकऱ्यांची फसवणूक; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

Swapnil S

मुंबई : हमीभाव नाही, शेतमाल खरेदी करायचा नाही, १ रुपयांत पिक विमा कागदावरच, संपूर्ण कर्ज माफी, वीज बिल माफ महायुतीच्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी विधानसभेत सत्ताधारी पक्षावर केला. २९३ अन्वये वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित करत शेतकरी आसमानी संकटात असताना महायुतीमुळे सुलतानी संकटात शेतकरी सापडला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

सरसकट कर्ज माफी, वीज बिल माफ, छावण्याची दुरवस्था, जनावरांसाठी दिवसभरात फक्त एक लिटर पाणी, अवकाळी पावसामुळे ११ हेक्टर जमीनीचे नुकसान झाले. हरिप हंगाम वाईट गेला, केंद्र सरकारने गेल्या वर्षी ही शेतकऱ्यांना मदत केली नाही, असे ही ते म्हणाले. युरीया खत आधी ५० किलोची बॅग २,२६० रुपयांत मिळत होती, त्यात वाढ करत आता २,४६० रुपयांना युरिया खताची बॅग मिळते. मात्र आता ५० किलो ऐवजी ४० किलोची बॅग केली, यात १० किलो कोणाच्या खिशात घातले, असा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

सोन्यावर २ टक्के जीएसटी, हिऱ्यावर ३ टक्के जीएसटी मात्र शेतकऱ्यांसाठी मुख्य साहित्य असलेल्या ट्रॅक्टर वर १८ टक्के जीएसटी याचा अर्थ महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी काही घेणं देणं नाही, असा टोला त्यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला.

आज विरोधात तुम्हाला शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. परंतु सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची जाण असू द्या, अशी टीका विधान सभा सदस्य बच्चू कडू यांनी वडेट्टीवार यांच्यावर केली.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था