महाराष्ट्र

देवाच्या आशीर्वादामुळे रामलल्ला मूर्ती अभिषेक, सरसंघचालक मोहन भागवत यांचे उद्गार

अयोध्या मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीचे अभिषेक करणे हे एक साहसी कार्य होते. जे देवाच्या आशीर्वादामुळे आणि इच्छेमुळे झाले- मोहन भागवत

Swapnil S

पुणे : अयोध्या मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीचे अभिषेक करणे हे एक साहसी कार्य होते. जे देवाच्या आशीर्वादामुळे आणि इच्छेमुळे झाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी आळंदी येथे गीता भक्ती अमृत महोत्सवात बोलताना केले.

भारताला त्याच्या कर्तव्यासाठी उठायचे आहे आणि जर तो समर्थ झाला नाही, तर जगाला लवकरच विनाशाला सामोरे जावे लागेल. असे सांगून ते म्हणाले की, २२ जानेवारीला रामलल्लाचे आगमन झाले. खूप संघर्षानंतर केलेले हे एक धाडसी काम होते. सध्याच्या पिढीला रामलल्लाला त्याच्या जागी उभे पाहण्याचे भाग्य लाभले आहे. हे प्रत्यक्षात घडले आहे, केवळ सर्वांनी त्यासाठी काम केले म्हणून नाही, तर देवाच्या आशीर्वादामुळे आणि इच्छेमुळे ते झाले आहे, असेही ते म्हणाले.

या समारंभात उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचेही भागवत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, जगाला जशी गरज आहे तसा भारतवर्ष वाढला पाहिजे. कोणत्याही कारणाने भारत समर्थ झाला नाही किंवा उदय झाला नाही, तर जगाला लवकरच विनाशाला सामोरे जावे लागेल. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील विचारवंतांना हे माहीत आहे. ते यावर बोलत आहेत आणि लिहीत आहेत. आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी भारताला उठावे लागेल, असेही भागवत म्हणाले.

गीता परिवार आयोजित गीता भक्ती अमृत महोत्सव हा आध्यात्मिक नेते श्री गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त भव्य सोहळा आहे, त्यावेळी भागवत बोलत होते.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड