महाराष्ट्र

राज्यातील शाळांत पसायदान पठण बंधनकारक; शालेय शिक्षण विभागाचे निर्देश

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यात सर्व शाळांमध्ये १४ ऑगस्ट रोजी पसायदानाचे सामूहिक पठण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यात सर्व शाळांमध्ये १४ ऑगस्ट रोजी पसायदानाचे सामूहिक पठण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

सन २०२५ वर्ष हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीचे वर्ष आहे. यानिमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचा पसायदानाच्या माध्यमातून दिलेला विचार राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये एकाच वेळी पोहचावा असा शासनाचा उद्देश आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी पुणे येथील शिक्षण विभागाचे आयुक्त यांना यासंदर्भात कळविले आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून हे आदेश राज्यातील सर्व अनुदानित, विना अनुदानित, खासगी, महापालिका, जिल्हा परिषद, संस्थात्मक शाळांना कळविण्यात आले आहेत.

ऐन उन्हाळ्यात राज्यात मलेरिया - डेंग्यूचा कहर! मुंबईत मलेरियाच्या ९१८ रुग्णांची नोंद; तीन महिन्यांतील एकूण रुग्णसंख्या २,३९२

समाज माध्यमांतील बदनामी रोखण्यासाठी समिती; पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली लवकरच स्थापना - मुख्यमंत्री

शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी 'लवकर या, लवकर जा' सवलत; मुंबई महानगर क्षेत्रासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घोषणा

कोविड लसीकरण दुष्परिणाम, भरपाई धोरण तयार करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश; तज्ज्ञ समिती स्थापन करण्यास नकार

पात्र मतदाराचे नाव कापले जाणार नाही! मुख्य निवडणूक आयुक्तांनी केले स्पष्ट