महाराष्ट्र

विरोधी पक्षांकडे नेतृत्वाचा पर्याय नाही; अजित पवार यांनी मोदी यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास

Swapnil S

पुणे : १४० कोटी जनतेची जबाबदारी घेण्यासाठी विरोधी पक्षांकडे नेतृत्वाचा पर्याय नाही. असे स्पष्ट सांगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. अजित पवार यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ही निवडणूक फक्त काही गावांसाठीच नाही तर राष्ट्रीय पातळीवर होत आहे. या निवडणुकीत मतदार ठरवतात की देशाच्या १४० कोटी जनतेची जबाबदारी कोण घेणार आहे. आम्हाला नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. विरोधी पक्षांकडे आम्हाला पर्याय दिसत नाही, असे सांगत अजित पवार यांनी बहुसंख्य लोकांचा असा विश्वास आहे की केवळ पंतप्रधान मोदीच देशाची प्रगती करू शकतात, असे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारच्या काळात झालेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली. पवार यांनी नमूद केले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त