महाराष्ट्र

पेट्रोल-डिझेलनंतर PNG-CNGची दरवाढ:दिल्लीत CNG एक रुपया आणि PNG 50 पैशांनी महाग, आजपासून नवीन दर लागू

वृत्तसंस्था

सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतर आता दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी-पीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशांतर्गत पीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपये, तर सीएनजीच्या दरात 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेल्या किमतींनंतर पीएनजी 37.61 रुपये आणि सीएनजी 35.86 रुपये किलोवर पोहोचला आहे. आजपासून नवीन दर लागू होतील.

सलग दोन दिवस वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर

देशभरात मंगळवार आणि बुधवारी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. बुधवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी, तर मुंबईत 85 पैशांनी वाढ झाली. या वाढीनंतर अंदमान आणि निकोबारच्या पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 78.52 रुपयांनी स्वस्त होत आहे. त्याच वेळी, महाराष्ट्रातील परभणीमध्ये सर्वात महाग पेट्रोल 114.80 रुपये आणि डिझेल 97.44 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

मंगळवारी डिझेल-पेट्रोलच्या दरात 80 पैशांसोबतच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही 50 रुपयांची वाढ करण्यात आली. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल कंपन्यांवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा दबाव आहे. अशा स्थितीत आगामी काळात पेट्रोल आणि डिझेल 20 रुपयांनी महाग होऊ शकते.

असे आहे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरील सरकारी टॅक्सचे गणित

गेल्या 3 वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवरील करातून सरकारला कोट्यवधींची कमाई झाली आहे. तुम्ही तुमच्या कारमध्ये 100 रुपये किमतीचे पेट्रोल टाकल्यावर त्यातील 52 रुपये टॅक्स म्हणून सरकारच्या खिशात जातात. महाराष्ट्रात, जास्तीत जास्त 52.50 रुपये (100 पैकी) कर म्हणून गोळा केले जातात. दुसरीकडे, जर तुम्ही दिल्लीत 100 रुपयांचे पेट्रोल भरले, तर त्यातील 45.3 रुपये सरकारकडे जातात

महावितरण कंपनीच्या विभाजनावर शिक्कामोर्तब; शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी महावितरणचा IPO येणार

आता राज्यभरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास चार वर्षांचा होणार; विद्यापीठांमध्ये २०२६-२७ पासून 'ऑनर्स' आणि 'संशोधन' पदवीचे नवे पर्याय उपलब्ध

Mumbai : बेस्टला आर्थिक बळाची गरज; महाव्यवस्थापकांचे पालिका आयुक्तांना निवेदन; एकरकमी ४ हजार कोटी देण्याची मागणी

उरण : आदिवासी वाड्यांची पाण्यासाठी वणवण; रानसई-पुनाडे धरणात अवघा ४७% साठा

आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार