जळगावच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच; मंत्री गुलाबराव पाटील आपल्या पुत्रासाठी आग्रही  
महाराष्ट्र

जळगावच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच; मंत्री गुलाबराव पाटील आपल्या पुत्रासाठी आग्रही

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच जळगाव जिल्ह्यात महायुतीत राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे.

Swapnil S

जळगाव : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच जळगाव जिल्ह्यात महायुतीत राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी वरिष्ठ पातळीवर तिकीट मिळवण्यासाठी गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले पुत्र प्रताप पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

विधान परिषदेच्या या जागेवर दोन वेळा भाजपा तर दोन वेळा शिवसेना विजयी झालेली आहे. यामुळे दोन्ही पक्षांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे. तरीही विजयी होण्यासाठी मतांचे गणित पाहता बहुमताचा आकडा हा भाजपाकडे आहे. त्यामुळे भाजपा जळगावच्या जागेसाठी ठाम आहे. या निवडणुकीसाठी ६३० मतदार असून गेल्या २० वर्षापासून ही जागा भाजपाकडे असल्याने ती जागा प्रतिष्ठेची बनली आहे. या जागेसाठी इच्छुकांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री व मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. मात्र उमेदवार देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.

२०१० मध्ये शिवसेनेकडून मनीष जैन आणि भाजपाकडून एकनाथ खडसे यांचे पुत्र निखील खडसे यात झालेली लढत ही राज्यभर गाजली होती. यात निखील खडसे यांचा १७ मतांनी पराभव झाला होता. २०१४ मध्ये भाजपाकडून गुरूमुख जगवानी हे बिनविरोध निवडून आले होते तर २०१६ मध्ये भाजाचे चंदुलाल पटेल हे विजयी झाले होते. यामुळे भाजपाने या जागेवर दावा केला असून जागा वाटपात भाजपा व शिंदे गट यात मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहिती नुसार, भाजपा विधान परिषदेच्या १२ जागा लढवणार असून त्यात जळगावची जागा आहे.मात्र गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुलासाठी जळगावच्या जागेचा आग्रह धरल्यास कदाचित मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Maharashtra Weather : पावसाचा तडाखा वाढणार; "समुद्रकिनारे, धबधब्यांपासून दूर राहा," मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला; रेल्वे मार्गावरील काम सुरू, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

Mumbai Rain : मुंबईसाठी रेड अलर्ट! ताशी ९० किमी वेगाने वादळी वारे; अतिवृष्टीचा इशारा, १५ हजार कर्मचारी तैनात

Mumbai Rain : मुसळधार पावसाचा धोका वाढला; खासगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे

Mumbai Rain : मुंबईच्या डबेवाल्यांनाही मुसळधार पावसाचा फटका; आज सेवा बंद