महाराष्ट्र

जरांगेंविरोधातील जनहित याचिका निकाली

Swapnil S

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर धारणे आंदोलन तसेच उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांना रोखा. या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करत त्यांच्याविरोधात धरणे आंदोलनाबरोबरच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी अखेर निकाली काढली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या तडजोडीनंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आल्याने याचिका निकाली काढली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे अडीच लाख कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल होणार असल्याने मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत पुण्याचे भारत अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस