रस्ता पूर्ण नाही, मग टोल कसला? मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुलीविरोधात रायगड प्रेस क्लबचा प्रशासनाला इशारा 
महाराष्ट्र

रस्ता पूर्ण नाही, मग टोल कसला? मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुलीविरोधात रायगड प्रेस क्लबचा प्रशासनाला इशारा

अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुरू करण्यात आलेल्या टोलवसुलीविरोधात आता रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

Swapnil S

माथेरान : अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुरू करण्यात आलेल्या टोलवसुलीविरोधात आता रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. जोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही आणि अधिकृत उद्घाटन होत नाही, तोपर्यंत टोलवसुली तत्काळ बंद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी रायगड प्रेस क्लबने केली.

अर्धवट रस्ता, खड्डे, सुरू असलेली कामे, वाहतूककोंडी आणि अपघातांच्या वाढत्या धोक्यामुळे नागरिक त्रस्त असताना प्रशासन जनतेच्या खिशावर टोलचा भार टाकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‘जनतेला सुविधा नाहीत, मग टोल वसुली कोणत्या आधारावर केली जाते?’ असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. विशेषतः ‘एमएच-४६’ आणि ‘एमएच-०६’ या स्थानिक नोंदणी क्रमांकाच्या वाहनांना तत्काळ टोलमाफी देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि प्रवास करणाऱ्या वाहनधारकांवर आर्थिक बोजा टाकला जात आहे.

Mumbai : २३,००० पाणथळ जागांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण; कायदेशीर संरक्षणाचा मार्ग मोकळा

Pune : रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी निर्मिती; ‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Melodi Team पुन्हा चर्चेत; पंतप्रधान मोदींच्या खास Melody गिफ्टने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video व्हायरल

Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी संस्थेचे वर्चस्व; ६० वर्षांचा करार, सुधार समितीत पडसाद उमटणार

Mumbai : डिसेंबरपर्यंत ग्रीन बाँड बाजारात; मोठ्या प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी तसेच उत्पन्नवाढीसाठी BMC चा निर्णय