महाराष्ट्र

मनोज जरांगेंसोबत तिसऱ्या आघाडीसाठी संभाजीराजेंची फिल्डिंग

सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर विधानसभेत २८८ उमेदवार उतरवण्याचा निर्णय २९ ऑगस्टला जाहीर करणार, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.

Swapnil S

कोल्हापूर : सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर विधानसभेत २८८ उमेदवार उतरवण्याचा निर्णय २९ ऑगस्टला जाहीर करणार, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे जरांगे यांनी विधानसभेच्या रिंगणात उडी घेतल्यास, त्यांच्यासोबत तिसरी आघाडी करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फिल्डिंग लावली आहे. यासंदर्भात लवकरच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बोलणी करणार असल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले.

समाजामध्ये काम करत असताना जरांगे पाटील यांचे उद्दिष्ट आणि माझा उद्देश एकच आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन काम करणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याबाबत आपली आणि मनोज जरांगे पाटील यांची अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र, यासंदर्भात आपण लवकरच चर्चा करू, असेही ते म्हणाले. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिले नाही तर राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

Maratha Reservation : मराठ्यांचे वादळ धडकणार; 'मुंबईत जाणारच' जरांगेंची घोषणा, १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानात उपोषण

Mumbai Modak Mahotsav 2026 : बाप्पाचा आवडता खाऊ मुंबईकरांना घरपोच; उकडीच्या व तळलेल्या मोदकांचा घेता येणार आस्वाद

BRICS Summit 2026 : पहलगाम हल्ल्याचा 'ब्रिक्स'कडून निषेध; 'नवी दिल्ली घोषणापत्र' स्वीकारले

गणेशभक्तांच्या वाटेत वाहतूककोंडीचे विघ्न; माणगावजवळ आठ किमीच्या रांगा, मुंबई ते मालवण २२ तास

Mumbai : २१ स्टॉल केले जमीनदोस्त; मानखुर्द, गोवंडीत अतिक्रमणविरोधी मोहीम, पालिकेच्या एम-पूर्व विभागाची कारवाई