महाराष्ट्र

मनोज जरांगेंसोबत तिसऱ्या आघाडीसाठी संभाजीराजेंची फिल्डिंग

सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर विधानसभेत २८८ उमेदवार उतरवण्याचा निर्णय २९ ऑगस्टला जाहीर करणार, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.

Swapnil S

कोल्हापूर : सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर विधानसभेत २८८ उमेदवार उतरवण्याचा निर्णय २९ ऑगस्टला जाहीर करणार, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे जरांगे यांनी विधानसभेच्या रिंगणात उडी घेतल्यास, त्यांच्यासोबत तिसरी आघाडी करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फिल्डिंग लावली आहे. यासंदर्भात लवकरच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बोलणी करणार असल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले.

समाजामध्ये काम करत असताना जरांगे पाटील यांचे उद्दिष्ट आणि माझा उद्देश एकच आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन काम करणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याबाबत आपली आणि मनोज जरांगे पाटील यांची अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र, यासंदर्भात आपण लवकरच चर्चा करू, असेही ते म्हणाले. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिले नाही तर राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

मुंबईत PM मोदी आणि मॅक्रॉन यांची गळाभेट; 'भारत-फ्रान्स इनोव्हेशन ईयर'चे करणार उद्घाटन, दिल्लीत AI समिटमध्येही होणार सहभागी

"तो आमचं सर्वस्व होता": एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाम्पत्याची आत्महत्या; ४ पानी सुसाईड नोटसह Video मेसेज व्हायरल

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

लोकलच्या गर्दीतून दिलासा,१२ वीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाग! KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु

ठाणे सामूहिक अत्याचार प्रकरण : पुण्यातून २२ वर्षीय आरोपीला अटक, वर्षभरापासून होता फरार