महाराष्ट्र

मनोज जरांगेंसोबत तिसऱ्या आघाडीसाठी संभाजीराजेंची फिल्डिंग

सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर विधानसभेत २८८ उमेदवार उतरवण्याचा निर्णय २९ ऑगस्टला जाहीर करणार, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.

Swapnil S

कोल्हापूर : सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर विधानसभेत २८८ उमेदवार उतरवण्याचा निर्णय २९ ऑगस्टला जाहीर करणार, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे जरांगे यांनी विधानसभेच्या रिंगणात उडी घेतल्यास, त्यांच्यासोबत तिसरी आघाडी करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फिल्डिंग लावली आहे. यासंदर्भात लवकरच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बोलणी करणार असल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले.

समाजामध्ये काम करत असताना जरांगे पाटील यांचे उद्दिष्ट आणि माझा उद्देश एकच आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन काम करणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याबाबत आपली आणि मनोज जरांगे पाटील यांची अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र, यासंदर्भात आपण लवकरच चर्चा करू, असेही ते म्हणाले. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिले नाही तर राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर