महाराष्ट्र

२४ तासांमध्ये ४ अपघात, चौपदरीकरणानंतरही कशेडी घाटात अपघातांची मालिका सुरूच

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४ अपघात...

Swapnil S

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४ अपघात झाल्यानंतर अपघातांची तीव्रता महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही कायमच राहिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता गोवा-पनवेल बसला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या रत्नागिरी-वसई बसने धडक दिली. याप्रकरणी एसटी बसचालक सिध्दार्थ बडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चोळई गावाच्या हद्दीमध्ये कशेडी घाटाच्या तीव्र उतारावर मशनरी घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या संरक्षक कठड्यालगत क्लिनरसाईडला धडकला. बुधवारी सकाळी एक टँकर रस्त्याच्या संरक्षक भिंतीलगत कलंडला. काही तासांतच आणखी दोन ट्रक सकाळी कलंडलेल्या टँकरच्या मागील भागात कलंडल्याने अपघाताचे चित्र कायम राहिले.

युनिस आगा यांनी फिर्याद दिल्यानुसार त्यांच्या ताब्यातील बस गोवा-पनवेल अशी फेरी करत असताना मागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या रत्नागिरी-वसई एसटी बसने धडक दिली. यावेळी वाहतूक पोलीस धायगुडे, पोलीस हवालदार जागडे यांनी पंचनामा करून एसटी बसचालक सिध्दार्थ बडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

मंगळवारी दुपारी चोळई गावाच्या हद्दीमध्ये कशेडी घाटाच्या तीव्र वळण उतारावर मशिनरी घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या संरक्षक कठड्यालगत असलेल्या क्लिनरसाईडला कलंडला. बुधवारी सकाळी एक टँकर रस्त्याच्या संरक्षक भिंतीलगत कलंडला. काही तासातच आणखी दोन ट्रक सकाळी कलंडलेल्या टँकरच्या मागील भागात कलंडल्याने चोळई येथील कशेडी घाटातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणानंतर झालेल्या अपघातांची संख्या चार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

राज्यातील पाच समुद्रकिनारे होणार चकाचक; कायमस्वरूपी ‘ब्लू-फ्लॅग’ दर्जासाठी प्रयत्न; २० कोटींचा निधी मंजूर

नौदलाला मिळणार बळ! 'इस्त्रो' लॉन्च करणार ४,४०० किलोचा सर्वाधिक वजनदार ‘सीएमएस-०३’ उपग्रह

घरगुती हिंसाचार खटल्यात पत्नीलाच न्यायालय निवडीचा हक्क; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Women’s World Cup : विक्रमी विजयासह भारतीय महिलांची अंतिम फेरीत धडक; जेमिमाच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून वर्चस्व

मेलबर्नमध्येही खेळखंडोबा? भारत-ऑस्ट्रेलियात आज दुसरा टी-२० सामना; पावसाचे सावट कायम