एएनआय
महाराष्ट्र

गोंदियात एसटी बस उलटून ११ ठार, २५ जखमी

गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी भरधाव वेगाने जाणारी एसटी महामंडळाची एक बस उलटून झालेल्या अपघातामध्ये ११ जण ठार झाले, तर अन्य २५ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनाला ओव्हरटेक करताना बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती घसरून उलटी झाली. सडकअर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ हा अपघात झाला.

Swapnil S

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी भरधाव वेगाने जाणारी एसटी महामंडळाची एक बस उलटून झालेल्या अपघातामध्ये ११ जण ठार झाले, तर अन्य २५ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनाला ओव्हरटेक करताना बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती घसरून उलटी झाली. सडकअर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ हा अपघात झाला.

सदर ‘शिवशाही’ बसमध्ये ३६ प्रवासी होते, बस भंडारा येथून गोंदियाला जात होती. वाटेत एका दुचाकीस्वाराला चुकविताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ही दुर्घटना घडली, असे ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गोंदिया-सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळच्या मुर्दाली जंगल परिसरातून एसटीची शिवशाही बस जात होती. बसची गती मर्यादेहून खूप जास्त होती. अचानक बसने पलटी घेतली. त्यानंतर बस बरेच फूट फरफटत गेली. या घटनेत बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. ही माहिती कळताच परिसरातील गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून शिंदे यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली